शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोरोना संसर्गाच्या मृत्यू तांडवात आशेचा किरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात मृत्यूचे जणू तांडव सुरू आहे. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात मृत्यूचे जणू तांडव सुरू आहे. पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्णत: तोकडी पडली. त्यामुळे आजारी पडल्यास स्वत:चे व कुटुंबाचे काय होणार, या प्रश्नाने नागरिक प्रचंड दहशतीत आहे. अशा या महामारीच्या संकटात जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीडीसी) कोविड प्रतिबंधासाठी ३० कोटींच्या निधीला मिळालेली मान्यता नागरिकांसाठी आशेचा किरण ठरण्याची शक्यता आहे.

मागील वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आणि जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीला कपातीची कात्री लागली. आराखड्यातील विकासाच्या पायाभूत कामांना निधी मिळू शकला नाही. कोविड-१९ च्या संकटावर मात करण्यासाठी डीपीसीसीचा निधी राखीव ठेवण्यात आला. मागील वर्षी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेची बरीच कामे मार्गी लागली. मात्र, कोविड संसर्गाचा संभाव्य उद्रेक लक्षात न घेतल्याने आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढविण्यात आली नाही. आता कोरोनाने मृत्यू तांडव सुरू केल्यानंतर बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व अन्य तातडीच्या आरोग्य सुविधा तोकड्या पडल्या. नागरिकांमध्ये कमालीचा संताप आहे. अशा संकट काळात पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तातडीने लक्ष घातले. परिणामी, जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) ३० कोटींच्या निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळाली. या निधीतून ऑक्सिजनसह आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

मंजूर निधी कुठे होणार?

कोरोना प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियमित जिल्हास्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३० कोटींचा निधी वापरता येणार आहे. यामध्ये कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स बेड्स, सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालये, मनपा, नगर परिषद रुग्णालये, औषधी व अन्य पायाभूत आरोग्य सुविधांसाठी वापरता येऊ शकतो.

डीपीडीसीला ३०० कोटींचा निधी

कोरोनामुळे राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा जिल्हा वार्षिक योजनेला मोठा फटका बसला. मागणीप्रमाणे निधी मिळाला नाही. परंतु, सर्वसाधारणसाठी ३०० कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यातील ३० टक्के म्हणजे ३० कोटींचा निधी कोविड प्रतिबंधासाठी खर्च करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

‘ते’ साडेसहा कोटी कोविडसाठीच

कोविडसाठी आमदार निधीतून प्रत्येकी एका कोटीचा निधी खर्च करण्यास नियोजन विभागाने परवानगी दिली. जिल्ह्यातील सहा आमदारांनी निधीसाठी प्रस्ताव सादर केला. याशिवाय, विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनी जिल्ह्यासाठी ४० लाख व आमदार वा. रा. गाणार यांनी २० लाखांचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केला आहे. एकूण सहा कोटी ६० लाखांचा निधी कोविड प्रतिबंधासाठी तातडीने वापरता येऊ शकतो.

कोट

जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन २०२१-२२ अंतर्गत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ३० टक्के निधी देण्याचे राज्य नियोजन विभागाचे निर्देश आहेत. त्यानुसार ३० कोटींच्या निधीला मान्यता मिळाली. हा निधी लवकरच वितरित होणार आहे.

-गजानन वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी, चंद्रपूर