शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

बायो जैविक शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

ठळक मुद्देहळदी येथील प्रयोग यशस्वी : त्रिसुत्रीने दिला रासायनिकयुक्त शेतीला फाटा

राजू गेडाम । ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रासायनिक खत व किटकनाशकांचे दुष्परिणाम हे भयंकर नुकसानकारक सिद्ध होत असताना हळदी येथील प्रयोगशील शेतकरी सुनिल चलाख यांनी सुरू केलेल्या बायो एफ जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग आशेचे किरण ठरला आहे. सुपीक भुसभुसीत माती, खर्चात बचत आणि उत्पन्नात हमखास वाढ ही त्रिसूत्री जैविक शेतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासायनिक शेतीला त्यांनी पूर्णत: फाटा दिला. त्यांचे कार्य अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळे सत्यक्रांतीच्या जैविक शेती विकास अभियान अंतर्गत शेतातील आमराईत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रगतीशील शेतकरी चलाख यांचा सत्कार व जैविक शेती जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.रासायनिक शेतीऐवजी जैविक शेतीचा अंगिकार सर्व शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न-आरोग्यसंपन्न परिवारासोबत सुपिक मातीची कास सर्वांनी धरावी. विषमुक्त असलेल्या पिकाची लागवड करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुव्यवस्थित राखण्यास मदत होईल, अशी माहिती सुनील चलाख यांनी दिली.अशी आहे शेतीरासायनिक खत व कीटकनाशके वापरल्याने शेत जमीन खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीसे होतात. हे टाळण्यासाठी हळदी येथील शेतकरी चलाख यानी आपल्या जनांवराच्या गोठ्यातील शेण, तणस, कचरा, काड्या आदी एकत्र करुन गावाशेजारी टाकले. त्या खताला उन्ह लागू नये, म्हणून सावलीसाठी ग्रीन जाळी बांधली. त्यानतर वेळोवेळी पाणी शिंपले. यातून गांडुळ तयार झाले. हे जैविक खत पिकाला उपयुक्त ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेती