शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे राजकुमार चुनारकर चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने ...

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे

राजकुमार चुनारकर

चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने आठवडाभरापासून चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे चिमूर, नेरी, भिसी, खडसंगी, वाहानगाव, बोथलीसह विविध ठिकाणच्या भागात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. असे असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होताना दिसत आहे.

या मजूर कमतरतेचा सामना करत रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात तर केली. मात्र कामांना विलंब होत आहे. दुसरीकडे पावसाने उसंत घेतल्याने अनेक ठिकाणी रोवणी थांबली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने कापूस व सोयाबीन निंदणाचे काम एकाचवेळी सुरू झाले. त्यामुळे मजूर विभागले गेल्याने शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे. अख्खे कुटुंब शेतात जात असल्याचे पाहून घरातील मुलेही आपला मदतीचा हात देत वडिलांना शेत कामाला मदत करीत आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर महिनाभर पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धान रोपे रोवणी करण्यायोग्य झाली. त्यामुळे भात लागवडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. भात रोपे खणून त्याची लागवड करण्याचे काम सुरू आहे.

मात्र याही वर्षी शेतमजूर भात रोवणी व निंदणाचे काम करण्यात विभागले गेल्याने मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे भात लागवड करण्याच्या कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतावर काम करण्यासाठी मजूर शोधावे लागत आहे. महतप्रयासाने दोन-चार महिला मजूर मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

बॉक्स

मजुरांऐवजी कुटुंबातील सदस्यच कामात

मजूर नसल्याने काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्य व नातेवाईक यांना सोबत घेऊन शेतातील कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी एकमेकांच्या शेतावर अदली-बदलीने जाऊन कामासाठी सहकार्य करीत आहेत. याचबरोबर शाळा बंद असल्याने घरातल्या घरात ऑनलाइन अभ्यासात कसरत करणारी मुलेही वडिलांची शेत कामाची परवड पाहून आपल्या परीने मदत करताना दिसत आहेत.

कोट

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले तर दुसरीकडे एक आठवड्यात पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीनचे निंदणाचे काम एकाच वेळी आले. त्यामुळे उपलब्ध मजूर विभागले गेले. त्याचा फटका मजूर मिळत नसून मजुरीही वाढत आहे.

-प्रशांत कोल्हे, शेतकरी