शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्लास्टिक पन्नीमुळे रामाळा तलावाचे पाणी दूषित

By admin | Updated: December 18, 2015 01:17 IST

येथील ऐतिहासिक रामाळा तलावातील पाणी प्लास्टिक पन्नीमुळे दूषित झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

चंद्रपूर : येथील ऐतिहासिक रामाळा तलावातील पाणी प्लास्टिक पन्नीमुळे दूषित झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. अनेक भाविक या तलावाच्या पाण्यात पूजेचे सामान, गहू, तांदूळ आदी वस्तू प्लॅस्टिक पिशव्यात बंद करून टाकतात. कालांतराने हे सामान कुजुन सडते. त्यातून पाणी दूषित होते. तलावातील मासे या बंद पिशव्यात तोंड घालतात. त्यातच अडकून ते मृत पावतात. त्यामुळे मृत माशांचाही दुर्गंध येतो. यावर उपाययोजना म्हणून याठिकाणी महानगरपालिकेने निर्माल्य कलश ठेवावा व भाविकांना त्याच कलशात पूजेचे साहित्य टाकणे बंधनकारक केल्यास रामाळा तलावातील पाणी दूषित होणार नाही, असे मासेमार बांधवांचे म्हणणे आहे.यासंदर्भात यापूर्वी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. तलावाच्या बाजुलाच रेल्वे साईडिंग असून याठिकाणी युरिया मोठ्या प्रमाणात उतरविला जातो. यादरम्यान सांडलेला युरिया नाल्याच्या सहाय्याने रामाळा तलावात येतो. त्यामुळेही पाण्याला दुर्गंधी येत आहे. या तलावात चार इंच हिरवागार थर तयार झाल्याने माशांना प्राणवायू मिळत नसल्याने त्या मृत होत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक बंडू हजारे, जगन पचारे, लक्ष्मण तोकला, पांडूरंग गावतुरे, संतोष झा, देवराव मंचलावार, ेयांनी केली आहे. (प्रतिनिधी)