शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

प्लास्टिक पन्नीमुळे रामाळा तलावाचे पाणी दूषित

By admin | Updated: December 18, 2015 01:17 IST

येथील ऐतिहासिक रामाळा तलावातील पाणी प्लास्टिक पन्नीमुळे दूषित झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

चंद्रपूर : येथील ऐतिहासिक रामाळा तलावातील पाणी प्लास्टिक पन्नीमुळे दूषित झाले असून यावर उपाययोजना करण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. अनेक भाविक या तलावाच्या पाण्यात पूजेचे सामान, गहू, तांदूळ आदी वस्तू प्लॅस्टिक पिशव्यात बंद करून टाकतात. कालांतराने हे सामान कुजुन सडते. त्यातून पाणी दूषित होते. तलावातील मासे या बंद पिशव्यात तोंड घालतात. त्यातच अडकून ते मृत पावतात. त्यामुळे मृत माशांचाही दुर्गंध येतो. यावर उपाययोजना म्हणून याठिकाणी महानगरपालिकेने निर्माल्य कलश ठेवावा व भाविकांना त्याच कलशात पूजेचे साहित्य टाकणे बंधनकारक केल्यास रामाळा तलावातील पाणी दूषित होणार नाही, असे मासेमार बांधवांचे म्हणणे आहे.यासंदर्भात यापूर्वी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. तलावाच्या बाजुलाच रेल्वे साईडिंग असून याठिकाणी युरिया मोठ्या प्रमाणात उतरविला जातो. यादरम्यान सांडलेला युरिया नाल्याच्या सहाय्याने रामाळा तलावात येतो. त्यामुळेही पाण्याला दुर्गंधी येत आहे. या तलावात चार इंच हिरवागार थर तयार झाल्याने माशांना प्राणवायू मिळत नसल्याने त्या मृत होत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक बंडू हजारे, जगन पचारे, लक्ष्मण तोकला, पांडूरंग गावतुरे, संतोष झा, देवराव मंचलावार, ेयांनी केली आहे. (प्रतिनिधी)