शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलाव लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन झोपेत । महिनाभरात ओसरले तीन ते साडेतीन फूट पाणी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला व शहरातील पाण्याची पातळी वाढती ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रामाळा तलाव मागील एक ते दीड महिन्यांपासून लिकेज आहे. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी असलेली गोंडराजाकालीन मोरीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मागील एक महिन्यात तलावातील पाण्याची पातळी तीन ते साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. याकडे मत्स व्यावसायिकांंनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही. या तलावातील पाणी सोडण्यासाठी गोंड राजाच्या काळातच एक मोरी बांधण्यात आली होती. ती आजही कायम आहे. मात्र मागील एक ते दीड महिन्यांपासून सरदार पटेल महाविद्यालयाच्या दिशेला असलेली ही मोरी लिकेज झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. मागील काही दिवसात तलावाची पातळी तीन ते साडेतीन फूट कमी झाल्याची माहिती आहे.परिसरातील पाणी पातळी खालावणाररामाळा तलावातील पाण्यामुळे त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढती राहते. मात्र तलावातील पाणी आता झपाट्याने कमी होत आहे. लवकरच मृतसाठ्यापर्यंत पातळी येईल. यामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावून नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.तलावातील पाणी दूषितरामाळा तलावातील पाणी अत्यंत दूषित आहे. मच्छी नाल्यातील पाणीही यात तलावात येऊन मिसळते. त्यामुळे या तलाव पाणी काढून स्वच्छ करण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे व पर्यावरणप्रेमींनी मागील वर्षी केली होती. मात्र सदर दूषित पाणी पुढे वर्धा नदीत जाईल आणि नदीदेखील दूषित होईल म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मागणी फेटाळली होती.तलाव लिकेज असल्याबाबत आपल्याला कळले आहे. मात्र तलावातील पाणी दूषित असल्यामुळे विसर्ग होऊ दिला जात आहे. पावसाळ्यात तलावात शुध्द पाणी राहील.- डॉ. कुणाल खेमणार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी