शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

रामाळा तलाव लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन झोपेत । महिनाभरात ओसरले तीन ते साडेतीन फूट पाणी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला व शहरातील पाण्याची पातळी वाढती ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रामाळा तलाव मागील एक ते दीड महिन्यांपासून लिकेज आहे. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी असलेली गोंडराजाकालीन मोरीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मागील एक महिन्यात तलावातील पाण्याची पातळी तीन ते साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. याकडे मत्स व्यावसायिकांंनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही. या तलावातील पाणी सोडण्यासाठी गोंड राजाच्या काळातच एक मोरी बांधण्यात आली होती. ती आजही कायम आहे. मात्र मागील एक ते दीड महिन्यांपासून सरदार पटेल महाविद्यालयाच्या दिशेला असलेली ही मोरी लिकेज झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. मागील काही दिवसात तलावाची पातळी तीन ते साडेतीन फूट कमी झाल्याची माहिती आहे.परिसरातील पाणी पातळी खालावणाररामाळा तलावातील पाण्यामुळे त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढती राहते. मात्र तलावातील पाणी आता झपाट्याने कमी होत आहे. लवकरच मृतसाठ्यापर्यंत पातळी येईल. यामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावून नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.तलावातील पाणी दूषितरामाळा तलावातील पाणी अत्यंत दूषित आहे. मच्छी नाल्यातील पाणीही यात तलावात येऊन मिसळते. त्यामुळे या तलाव पाणी काढून स्वच्छ करण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे व पर्यावरणप्रेमींनी मागील वर्षी केली होती. मात्र सदर दूषित पाणी पुढे वर्धा नदीत जाईल आणि नदीदेखील दूषित होईल म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मागणी फेटाळली होती.तलाव लिकेज असल्याबाबत आपल्याला कळले आहे. मात्र तलावातील पाणी दूषित असल्यामुळे विसर्ग होऊ दिला जात आहे. पावसाळ्यात तलावात शुध्द पाणी राहील.- डॉ. कुणाल खेमणार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी