शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:39 IST

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती.

ठळक मुद्देखुर्च्या तुटलेल्या, फरशा निघालेल्या, झुडपे वाढली, प्रवेशद्वाराचा मार्ग खडतर

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. आता या गार्डनमध्ये पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही, इतकी दैना या गार्डनची झालेली आहे. आझाद बगिच्यातील काही साहित्य टिकून असले तरी या बगिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे अनावश्यक झाडांनी बागेलाच गिळंकृत केले आहे.चंद्रपूर शहराच्या मध्यभागी गोंड राजाच्या काळातील तलाव आहे. त्याला रामाळा तलाव असे संबोधले जातात. या तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या तलावातील जलसाठ्यामुळे परिसरात भुजलसाठा टिकून राहतो. या तलावाच्या बळावर अनेकांच्या घरी असलेल्या हातपंपांना वर्षभर पाणी येते. या तलावाच्या सौंदर्यात भर पडावी. तसेच शहरातील नागरिकांना अपुºया पडत असलेल्या आझाद बगिच्याव्यतिरित विरंगुळा म्हणून एक चांगला बगिचा मिळावा या हेतूने कासवाच्या आकाराच्या बगिच्याची निर्मिती या रामाळा तलावात करण्यात आली. हे गार्डन जनतेसाठी खुले झाल्यानंतर या ठिकाणी लहानमुलांना घेऊन चंद्रपूरकर मोठ्या संख्येने येथे आपला वेळ घालवत होते. सुटीच्या दिवशी तर येथे जत्रेचे स्वरुप यायचे. ‘नव्याचे नऊदिवस’ या प्रमाणे या गार्डनची अवस्था झालेली आहे. या गार्डनच्या देखभालीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे हे गार्डन आता सौंदर्य घालवून बसले आहे. गार्डनमध्ये असलेले मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडक्या अवस्थेत दिसत आहे. बसण्याच्या खुर्च्याही तुटलेल्या आहेत. झुडपे वाढलेली आहे. कारंजासाठी केलेल्या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील फरशा उखडलेल्या आहेत. प्रवेशद्वारापासून जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. इतकेच नव्हे, तर रामाळा तलावातील पाण्याचीही दुर्गंधी चंद्रपूरकरांना येथे येताना त्रासदायक ठरत आहे.सुरक्षेची ऐशीतैसीरामाळा गार्डनमध्ये दिवसभर अनेक मुले-मुली येतात. या मुला-मुलींवर टपोरींची तिरकस नजर असते. मात्र सुरक्षेची कसलीही हमी येथे मिळत नाही. या परिसरात स्टंटबाजीही बघायला मिळते. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. नुकतेचे दोन युवकांना अशाच स्टंटबाजीला बळी पडावे लागले.आंबटशौकिनांसाठी सुरक्षित ठिकाणआता हे गार्डन केवळ आंबटशौकिन प्रेमीयुगलांसाठी सुरक्षेचे ठिकाण बनले आहे. सकाळपासून दिवसभर येथे मजनुंचा वावर असतो. तेथे तयार झालेल्या झुडपांमध्ये चुकीने पाय पडला, तर कुणाच्याही अंगावर पडू शकतो. या व्यतिरिक्त या गार्डनमध्ये कुणीही दिसत नाही. अशी बिकट अवस्था या गार्डनची झालेली आहेत.आझाद गार्डनची मिनी ट्रेन बंदचआझाद बागेत लहानमुलांना खेळण्यासाठी अनेक साहित्य होते. बागेत लहानमुलांसाठी मिनी ट्रेनसुद्धा धावत होती. हे सगळे विरंगुळ्याचे साहित्य आझाद बगिच्यासह रामाळा गार्डनमध्ये नावालाच उरले आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे आता केवळ सकाळी फिरण्यासाठी तेवढा आझाद बगिच्याचा वापर उरला आहे.