शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:39 IST

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती.

ठळक मुद्देखुर्च्या तुटलेल्या, फरशा निघालेल्या, झुडपे वाढली, प्रवेशद्वाराचा मार्ग खडतर

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. आता या गार्डनमध्ये पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही, इतकी दैना या गार्डनची झालेली आहे. आझाद बगिच्यातील काही साहित्य टिकून असले तरी या बगिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे अनावश्यक झाडांनी बागेलाच गिळंकृत केले आहे.चंद्रपूर शहराच्या मध्यभागी गोंड राजाच्या काळातील तलाव आहे. त्याला रामाळा तलाव असे संबोधले जातात. या तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या तलावातील जलसाठ्यामुळे परिसरात भुजलसाठा टिकून राहतो. या तलावाच्या बळावर अनेकांच्या घरी असलेल्या हातपंपांना वर्षभर पाणी येते. या तलावाच्या सौंदर्यात भर पडावी. तसेच शहरातील नागरिकांना अपुºया पडत असलेल्या आझाद बगिच्याव्यतिरित विरंगुळा म्हणून एक चांगला बगिचा मिळावा या हेतूने कासवाच्या आकाराच्या बगिच्याची निर्मिती या रामाळा तलावात करण्यात आली. हे गार्डन जनतेसाठी खुले झाल्यानंतर या ठिकाणी लहानमुलांना घेऊन चंद्रपूरकर मोठ्या संख्येने येथे आपला वेळ घालवत होते. सुटीच्या दिवशी तर येथे जत्रेचे स्वरुप यायचे. ‘नव्याचे नऊदिवस’ या प्रमाणे या गार्डनची अवस्था झालेली आहे. या गार्डनच्या देखभालीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे हे गार्डन आता सौंदर्य घालवून बसले आहे. गार्डनमध्ये असलेले मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडक्या अवस्थेत दिसत आहे. बसण्याच्या खुर्च्याही तुटलेल्या आहेत. झुडपे वाढलेली आहे. कारंजासाठी केलेल्या तलावातील पाण्याला दुर्गंधी सुटलेली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील फरशा उखडलेल्या आहेत. प्रवेशद्वारापासून जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. इतकेच नव्हे, तर रामाळा तलावातील पाण्याचीही दुर्गंधी चंद्रपूरकरांना येथे येताना त्रासदायक ठरत आहे.सुरक्षेची ऐशीतैसीरामाळा गार्डनमध्ये दिवसभर अनेक मुले-मुली येतात. या मुला-मुलींवर टपोरींची तिरकस नजर असते. मात्र सुरक्षेची कसलीही हमी येथे मिळत नाही. या परिसरात स्टंटबाजीही बघायला मिळते. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहात नाही. नुकतेचे दोन युवकांना अशाच स्टंटबाजीला बळी पडावे लागले.आंबटशौकिनांसाठी सुरक्षित ठिकाणआता हे गार्डन केवळ आंबटशौकिन प्रेमीयुगलांसाठी सुरक्षेचे ठिकाण बनले आहे. सकाळपासून दिवसभर येथे मजनुंचा वावर असतो. तेथे तयार झालेल्या झुडपांमध्ये चुकीने पाय पडला, तर कुणाच्याही अंगावर पडू शकतो. या व्यतिरिक्त या गार्डनमध्ये कुणीही दिसत नाही. अशी बिकट अवस्था या गार्डनची झालेली आहेत.आझाद गार्डनची मिनी ट्रेन बंदचआझाद बागेत लहानमुलांना खेळण्यासाठी अनेक साहित्य होते. बागेत लहानमुलांसाठी मिनी ट्रेनसुद्धा धावत होती. हे सगळे विरंगुळ्याचे साहित्य आझाद बगिच्यासह रामाळा गार्डनमध्ये नावालाच उरले आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे आता केवळ सकाळी फिरण्यासाठी तेवढा आझाद बगिच्याचा वापर उरला आहे.