शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बांबूनिर्मित राखीने बंदीवान साजरा करणार रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:57 IST

कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे.

ठळक मुद्देआकाश दिवे साकारण्याच्या कामाला वेग : २७ बंदीवान प्रशिक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे. कारागृहात प्रशासनाच्या वतीने व बीआरटीसीच्या वतीने बंदीवान रक्षाबंधनानिमीत्त बांबूपासून आकर्षक राख्या तयार करीत असून याचाच वापर करुन ते कारागृहात रक्षाबंधन साजरा करणार आहेत. तसेच दिवाळीसाठीसुद्धा आकाशकंदील बनविण्याच्या कामाला गती आली आहे.जिल्हा कारागृह येथे वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बांबू संशोधन व हस्तकला प्रशिक्षण केंद्र कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या परवानगीने बंदी बांधवांसाठी सुरु करण्यात आले. या माध्यमातून बंदीवानांना विविध प्रकारच्या कलाकुसराच्या वस्तू व हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण बंदीवानांना देण्यात आले. त्यामुळे कारागृहातील १७ पुरुष व १० महिला बंदीवान यामध्ये पारांगत झाले आहेत.नुकताच रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदीवान बांबूपासून आकर्षक अशा राख्या तयार करीत आहेत. याच राख्याचा वापर करुन ते बंदीवान कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत. तर दिवाळीमध्ये सर्वांच्या घरी मोठ्या प्रमाणात आकाशकंदीलांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे आकाशकंदीलला मोठी मागणी असते. म्हणूनच बंदीवान बांबूपासून आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत.यासाठी बंदीबांधवांना कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या नेतृत्वात वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, देवाजी फलके, गौरव पाचाडे, रिंकू गौर, पद्माकर मेश्राम, लवकुश चव्हाण मदत करीत आहेत.रोजगारासाठी सक्षमबांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलेच्या विविध वस्तूपासून बंदीवानांना कारागृहात रोजगार प्राप्त झाला आहे. बंदीवान या कामात अत्यंत पारांगत झाल्यामुळे कारागृहातून शिक्षा भोगून सुटल्यानंतर बंदीवान स्वत: चा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होणार आहेत. त्यामुळे बंदी पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासन व बीआरटीसीने उचललेले पाऊल अत्यंत प्रशंसनीय असल्याचे बोलले जात आहे.