शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांबूनिर्मित राखीने बंदीवान साजरा करणार रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:57 IST

कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे.

ठळक मुद्देआकाश दिवे साकारण्याच्या कामाला वेग : २७ बंदीवान प्रशिक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कारागृहातून बंदीवान सुटल्यानंतर त्याला रोजगार मिळावा या हेतूने बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीतर्फे बंदीवानांना बांबूपासून निरनिराळ्या कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून प्रशिक्षीत झालेल्या १७ पुरुष बंदीवान व १० महिला बंदी कारागृहात बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करीत आहे. कारागृहात प्रशासनाच्या वतीने व बीआरटीसीच्या वतीने बंदीवान रक्षाबंधनानिमीत्त बांबूपासून आकर्षक राख्या तयार करीत असून याचाच वापर करुन ते कारागृहात रक्षाबंधन साजरा करणार आहेत. तसेच दिवाळीसाठीसुद्धा आकाशकंदील बनविण्याच्या कामाला गती आली आहे.जिल्हा कारागृह येथे वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बांबू संशोधन व हस्तकला प्रशिक्षण केंद्र कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या परवानगीने बंदी बांधवांसाठी सुरु करण्यात आले. या माध्यमातून बंदीवानांना विविध प्रकारच्या कलाकुसराच्या वस्तू व हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण बंदीवानांना देण्यात आले. त्यामुळे कारागृहातील १७ पुरुष व १० महिला बंदीवान यामध्ये पारांगत झाले आहेत.नुकताच रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदीवान बांबूपासून आकर्षक अशा राख्या तयार करीत आहेत. याच राख्याचा वापर करुन ते बंदीवान कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत. तर दिवाळीमध्ये सर्वांच्या घरी मोठ्या प्रमाणात आकाशकंदीलांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे आकाशकंदीलला मोठी मागणी असते. म्हणूनच बंदीवान बांबूपासून आकाशकंदील तयार करण्याचे काम करीत आहेत.यासाठी बंदीबांधवांना कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांच्या नेतृत्वात वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, देवाजी फलके, गौरव पाचाडे, रिंकू गौर, पद्माकर मेश्राम, लवकुश चव्हाण मदत करीत आहेत.रोजगारासाठी सक्षमबांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलेच्या विविध वस्तूपासून बंदीवानांना कारागृहात रोजगार प्राप्त झाला आहे. बंदीवान या कामात अत्यंत पारांगत झाल्यामुळे कारागृहातून शिक्षा भोगून सुटल्यानंतर बंदीवान स्वत: चा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होणार आहेत. त्यामुळे बंदी पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासन व बीआरटीसीने उचललेले पाऊल अत्यंत प्रशंसनीय असल्याचे बोलले जात आहे.