शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

रिपब्लिकन पार्टीच्या युवक अध्यक्षपदी वृषभ गुळधाने चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्षपदी वृषभ सुधाकर गुळधाने ...

रिपब्लिकन पार्टीच्या युवक अध्यक्षपदी वृषभ गुळधाने

चंद्रपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्षपदी वृषभ सुधाकर गुळधाने यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी निवड केली आहे. नुकतेच त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्ष संगठन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मान त्यांनी व्यक्त केला आहे.

रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी

चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेकजण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात. परंतु, येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने अपघाताची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चंद्रपुरातील क्रिष्णनगर येथे वृक्षारोपण

चंद्रपूर : येथील क्रिष्णनगर परिसरातील सरस्वती शिक्षण महिला मंडळाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम छोटू तिघाडे यांच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी कार्यक्रम केंद्राचे प्रमुख घनश्याम कामकार, उपनिरीक्षक सुनंदा कोवे, पूनम बांबोळे, विजय घोडमारे, रवि घोरघाटे, राजेश क्षीरसागर, रंजना आसुटकर, कल्याणी रायपुरे, समीर बोरकर आदी उपस्थित होते.

बसस्थानकाच्या कामाला गती द्यावी

चंद्रपूर : येथील बसस्थानकाचे काम मागील अनेक दिवसांपासून कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे बस लावण्यासाठी बसचालकांना मोठी अडचण होत आहे. याचा फटका प्रवाशांनासुद्धा बसत आहे. कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी बघायला मिळते. परंतु, बसस्थानकाचे काम संथगतीने सुररू असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.

महागाई कमी करण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्ज वितरण मोहीम राबवावी

चंद्रपूर : कोरोनाने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी अनेकजण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठी अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याने त्याचा फायदा मिळत नाही.