शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरीत हाहाकार, एक जण वाहून गेला, शेकडो घरांत पाणी घुसले, शेतीचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला असून ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पहाटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ४ ते ५ तास हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुका पाण्याखाली आला आहे. सुंदरनगर, हनुमाननगर, भवानी वार्ड, कुर्झा प्रभागात जवळपास १०० घरांचे तसेच ग्रामीण भागात १२५ घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील बेटाळा येथील लक्ष्मीबाई सौंदरकर या महिलेच्या अंगावर भिंत पडून ती गंभीर जखमी झाली आहे. तर बोढेगाव येथील पुंडलिक रामाजी गाढे (६५) हे पाण्यात पाहून गेल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. नागभीड नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या बाम्हणीला पुराच्या पाण्याने पुन्हा वेढले असून ३५० घरांची लोकवस्ती असलेले संपूर्ण गावच बाधित झाले आहे. नागभीड - बाम्हणी नाला ओसंडून वाहू लागल्याने काही वेळासाठी नागपूर - नागभीड मार्ग बंद करण्यात आला होता. तर चिमूर तालुक्यातील खैरी व पांजरेपार गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पूर्णत: जलमय झाले आहेत.अघोषित संचारबंदीब्रह्मपुरी शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघला नाही. परिणामी शहरात अघोषित संचारबंदीचे दृश्य आज बघायला मिळाले. शाळा, महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी जाऊ शकले नाही. सकाळी ९ नंतर काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसले.बारई तलाव फुटण्याच्या मार्गावरब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही. सदर तलाव खासगी मालकीचा असल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. तलावाची मालकी असल्याचे सांगणारेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो घरांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. शांतीनगरातील शतायू रुग्णालयात उपचारासाठी जाणाºया रुग्णांना ३ ते ४ फूट पाण्यातून मार्ग काढत जावे लागले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.तालुक्यातील शेतकरी संकटातचिमूर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या दुसºया इनींगमुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली आल्याने हा हंगाम शेतकऱ्यांना नुकसान दायक ठरणार असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सावधगिरीचा इशाराशहरातील बारई तलावाची धोकादायक स्थिती लक्षात घेता तलावाच्या खालील भागात राहणाºया शेषनगर परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळप्रसंगी सदर भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ दरवाजे दीड मीटरने व २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर