शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरीत हाहाकार, एक जण वाहून गेला, शेकडो घरांत पाणी घुसले, शेतीचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला असून ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पहाटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ४ ते ५ तास हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुका पाण्याखाली आला आहे. सुंदरनगर, हनुमाननगर, भवानी वार्ड, कुर्झा प्रभागात जवळपास १०० घरांचे तसेच ग्रामीण भागात १२५ घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील बेटाळा येथील लक्ष्मीबाई सौंदरकर या महिलेच्या अंगावर भिंत पडून ती गंभीर जखमी झाली आहे. तर बोढेगाव येथील पुंडलिक रामाजी गाढे (६५) हे पाण्यात पाहून गेल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. नागभीड नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या बाम्हणीला पुराच्या पाण्याने पुन्हा वेढले असून ३५० घरांची लोकवस्ती असलेले संपूर्ण गावच बाधित झाले आहे. नागभीड - बाम्हणी नाला ओसंडून वाहू लागल्याने काही वेळासाठी नागपूर - नागभीड मार्ग बंद करण्यात आला होता. तर चिमूर तालुक्यातील खैरी व पांजरेपार गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पूर्णत: जलमय झाले आहेत.अघोषित संचारबंदीब्रह्मपुरी शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघला नाही. परिणामी शहरात अघोषित संचारबंदीचे दृश्य आज बघायला मिळाले. शाळा, महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी जाऊ शकले नाही. सकाळी ९ नंतर काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसले.बारई तलाव फुटण्याच्या मार्गावरब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही. सदर तलाव खासगी मालकीचा असल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. तलावाची मालकी असल्याचे सांगणारेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो घरांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. शांतीनगरातील शतायू रुग्णालयात उपचारासाठी जाणाºया रुग्णांना ३ ते ४ फूट पाण्यातून मार्ग काढत जावे लागले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.तालुक्यातील शेतकरी संकटातचिमूर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या दुसºया इनींगमुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली आल्याने हा हंगाम शेतकऱ्यांना नुकसान दायक ठरणार असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सावधगिरीचा इशाराशहरातील बारई तलावाची धोकादायक स्थिती लक्षात घेता तलावाच्या खालील भागात राहणाºया शेषनगर परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळप्रसंगी सदर भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ दरवाजे दीड मीटरने व २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर