शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरीत हाहाकार, एक जण वाहून गेला, शेकडो घरांत पाणी घुसले, शेतीचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला असून ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पहाटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ४ ते ५ तास हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुका पाण्याखाली आला आहे. सुंदरनगर, हनुमाननगर, भवानी वार्ड, कुर्झा प्रभागात जवळपास १०० घरांचे तसेच ग्रामीण भागात १२५ घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील बेटाळा येथील लक्ष्मीबाई सौंदरकर या महिलेच्या अंगावर भिंत पडून ती गंभीर जखमी झाली आहे. तर बोढेगाव येथील पुंडलिक रामाजी गाढे (६५) हे पाण्यात पाहून गेल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. नागभीड नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या बाम्हणीला पुराच्या पाण्याने पुन्हा वेढले असून ३५० घरांची लोकवस्ती असलेले संपूर्ण गावच बाधित झाले आहे. नागभीड - बाम्हणी नाला ओसंडून वाहू लागल्याने काही वेळासाठी नागपूर - नागभीड मार्ग बंद करण्यात आला होता. तर चिमूर तालुक्यातील खैरी व पांजरेपार गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पूर्णत: जलमय झाले आहेत.अघोषित संचारबंदीब्रह्मपुरी शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघला नाही. परिणामी शहरात अघोषित संचारबंदीचे दृश्य आज बघायला मिळाले. शाळा, महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी जाऊ शकले नाही. सकाळी ९ नंतर काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसले.बारई तलाव फुटण्याच्या मार्गावरब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही. सदर तलाव खासगी मालकीचा असल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. तलावाची मालकी असल्याचे सांगणारेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो घरांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. शांतीनगरातील शतायू रुग्णालयात उपचारासाठी जाणाºया रुग्णांना ३ ते ४ फूट पाण्यातून मार्ग काढत जावे लागले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.तालुक्यातील शेतकरी संकटातचिमूर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या दुसºया इनींगमुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली आल्याने हा हंगाम शेतकऱ्यांना नुकसान दायक ठरणार असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सावधगिरीचा इशाराशहरातील बारई तलावाची धोकादायक स्थिती लक्षात घेता तलावाच्या खालील भागात राहणाºया शेषनगर परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळप्रसंगी सदर भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ दरवाजे दीड मीटरने व २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर