शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जिल्ह्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:36 IST

मागील काही दिवसांपासून चातकासारखी वाट बघूनही पाऊस हुलकावनी देत असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला.

ठळक मुद्देउकाळ्यापासून दिलासा : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चातकासारखी वाट बघूनही पाऊस हुलकावनी देत असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला. खरीप पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.गुरुवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास काही तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. चंद्रपूर शहरातही सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे बालकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. जिल्ह्यातील कोरपना, बल्लारपूर, राजुरा, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, मूल तालुक्यातील सुशीदाबगाव परिसरात तुलनेने अधिक पाऊस पडला. चंद्रपूरकडे जाणाºया मार्गावरील नाल्याला पूर आला. परिणामी, वाहतूक प्रभावित झाली. सुशी परिसरातील नागरिकांना दुसरा मार्ग नसल्याने नाल्यातून वाट काढावी लागली. पावसाचे आगमन झाल्याने दमदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी दिली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला होता. यंदाचे चित्र निराशाजनक आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु पेरणीसाठी आजचा पाऊस पुरेसा नाही. सर्वच तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी धुळपेरणी केली. पाऊस नसल्याने बियाणे करपले. त्यामुळे जिल्ंह्यातील काही शेतकºयांना दूबार पेरणी करावी लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस