शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

By admin | Updated: July 24, 2015 01:02 IST

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

धानाच्या रोवणीला वेग : शेतपिकांना आला बहरचंद्रपूर/मूल/ब्रह्मपुरी : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात रोवणीच्या कामांना वेग आला असून इतरही ठिकाणी पावसाने पिकांना बहर आली आहे. गेल्या २४ तासात ९८७.४ मिमी पावसाची नोंद झाली. मूल तालुक्यात तब्बल १९ दिवसानंतर पाऊस झाला. गेल्या चोविस तासात ९६.६ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शेतातील पेरलेले धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी पुरता खचला होता. दुबार पेरणी करावी लागणार काय, या चिंतेत असताना वरुण राजाचे आगमन झाल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावण्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून २०१३.५९ हेक्टर आर क्षेत्रात धानाची लागवड लावण्यात आली आहे. तर ३४१ हेक्टर आर क्षेत्रात आवत्या, सोयाबीन १११२ हेक्टर, कापूस ७५ हेक्टर तर तूर ४३८ हेक्टर आर मध्ये लावण्यात आले आहे. धानाची पेरणी केल्यानंतर तब्बल १९ दिवस पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होती. तर ब्रह्मपुरी तालुक्यात बुधवारी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली. धान या पावसाने रोवणी कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील खरीप पिकांचे क्षेत्र २९ हजार ४६० हेक्टर असून जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीवरील रोवण्या पावसाने खोळंबल्या होत्या. धानपिकांचे पऱ्हे कोमजलेल्या अवस्थेत होते. परंतु बुधवारी २८.८ मिमी पाऊस झाल्याने रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गावखेड्यात रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेगही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पहिले रोवणी पूर्ण करण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मारलेली दडी सर्वच स्तरातील लोकांना चिंतेचा विषय असताना कालच्या पावसाने थोडी मुक्तता मिळवून दिली आहे.मात्र पावसाची उघडझाप सुरू असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतरही अनेकांच्या घरातील कुलर अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)वीज पडल्याने लाखोंचे नुकसानमारोडा : मूल तालुक्यात बुधवारी मुसळधार व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. कमलाकर गडपल्लीवार यांच्या घरावर मध्यरात्री वीज कोसळल्याने त्यांचे व शेजाऱ्यांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी झालीत. टीव्ही संच, फ्रिज, मीटर व विद्युत बोर्डचे नुकसान झाले. शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी तुम्मे, सतीश खोबरे, दिलीप नेरलवार, वासुदेव शंखदरवार यांचे टी.व्ही. संच निकामी झाले. या नैसर्गिक आपत्तीत जीवहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.