शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मिळाला बळीराजाला दिलासा

By admin | Updated: July 24, 2015 01:02 IST

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

धानाच्या रोवणीला वेग : शेतपिकांना आला बहरचंद्रपूर/मूल/ब्रह्मपुरी : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरी, मुल तालुक्यात रोवणीच्या कामांना वेग आला असून इतरही ठिकाणी पावसाने पिकांना बहर आली आहे. गेल्या २४ तासात ९८७.४ मिमी पावसाची नोंद झाली. मूल तालुक्यात तब्बल १९ दिवसानंतर पाऊस झाला. गेल्या चोविस तासात ९६.६ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शेतातील पेरलेले धानाचे पऱ्हे करपायला लागल्याने शेतकरी पुरता खचला होता. दुबार पेरणी करावी लागणार काय, या चिंतेत असताना वरुण राजाचे आगमन झाल्याने बळीराजा काही प्रमाणात सुखावण्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून २०१३.५९ हेक्टर आर क्षेत्रात धानाची लागवड लावण्यात आली आहे. तर ३४१ हेक्टर आर क्षेत्रात आवत्या, सोयाबीन १११२ हेक्टर, कापूस ७५ हेक्टर तर तूर ४३८ हेक्टर आर मध्ये लावण्यात आले आहे. धानाची पेरणी केल्यानंतर तब्बल १९ दिवस पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होती. तर ब्रह्मपुरी तालुक्यात बुधवारी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली. धान या पावसाने रोवणी कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील खरीप पिकांचे क्षेत्र २९ हजार ४६० हेक्टर असून जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीवरील रोवण्या पावसाने खोळंबल्या होत्या. धानपिकांचे पऱ्हे कोमजलेल्या अवस्थेत होते. परंतु बुधवारी २८.८ मिमी पाऊस झाल्याने रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गावखेड्यात रोवणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता असताना ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या वेगही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पहिले रोवणी पूर्ण करण्याचा कल असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मारलेली दडी सर्वच स्तरातील लोकांना चिंतेचा विषय असताना कालच्या पावसाने थोडी मुक्तता मिळवून दिली आहे.मात्र पावसाची उघडझाप सुरू असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतरही अनेकांच्या घरातील कुलर अद्याप सुरू आहेत. (प्रतिनिधी)वीज पडल्याने लाखोंचे नुकसानमारोडा : मूल तालुक्यात बुधवारी मुसळधार व विजांच्या कडकडाटसह पाऊस झाला. कमलाकर गडपल्लीवार यांच्या घरावर मध्यरात्री वीज कोसळल्याने त्यांचे व शेजाऱ्यांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी झालीत. टीव्ही संच, फ्रिज, मीटर व विद्युत बोर्डचे नुकसान झाले. शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी तुम्मे, सतीश खोबरे, दिलीप नेरलवार, वासुदेव शंखदरवार यांचे टी.व्ही. संच निकामी झाले. या नैसर्गिक आपत्तीत जीवहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.