शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हॉर्वेस्टिंग काळाची गरज

By admin | Updated: July 6, 2015 00:47 IST

देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते.

रमाकांत लोधे यांनी केला घरीच प्रयोग : इतरांनीही घ्यावा आदर्शनवरगाव : देशातील विविध भागामध्ये पाण्याची समस्या नेहमी जाणवते. आपल्याकडे विशेषत: पावसाळ्यातच पाणी येते आणि वाहून जाते. त्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असा नारा शासनाला द्यावा लावला. यासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) ही काळाची गरज आहे.आज सर्वत्र गावात आणि शेतात बोअरवेल खोदल्या जात असून त्याद्वारे जमिनीतील पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. मात्र जमिनीमध्ये पाणी मुरविण्याचे कामही आवश्यक आहे. याची जाणीव झाल्याने सिंदेवाही पंचायत समितीचे उपसभापती रमाकांत लोधे यांनी रत्नापूर येथे आपल्या निवासस्थानी चार-पाच हजार रुपये खर्च करून रेन वॉटर हॉर्वेस्टिंग (पावसाच्या पाण्याचे संधारण) चा प्रयोग सुरू केला. त्यांच्या घराच्या ३५०० ते ४००० हजार स्क्वे.फुट स्लॅबवरील पावसाचे पाणी विहिरीत टाकण्याचा अभिनव व यशस्वी प्रयोग केला आहे. पावसाचे पाणी विहिरीत टाकण्यासाठी स्लॅबला पीव्हीसी पाईप ७५ एम.एम., ४ केजी त्यांनी एकत्र जोेडले व ते आवारातील विहिरीपर्यंत आणले. त्यामुळे स्लॅबवर पडलेले पावसाचे पाणी इतरत्र न जाता विहिरीमध्ये पाईपद्वारे येते व विहिरीतच मुरते.उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई भासते. भुजल पातळी खाली जाते. विहिरीत पाणी राहत नाही.ग्रामीण भागामध्ये नळयोजना असली तरी तीन-चार दिवसानंतर नळाला पाणी येते. नदीलाच पाणी नाही तर नळाला कुठून येणार, अशी ओरड सुरू होते. उन्हाळ्यामध्ये एका व्यक्तीला साधारणत: ४० लिटर पाणी लागते, असे शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. समजा ६०० चौरस फुट छपराचे पाणी विहिरीत टाकले किंवा जमिनीत मुरवले तर एका वर्षाला अंदाजे पर्जन्यमानानुसार ६० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. हे ६० हजार लिटर पाणी वर्षभरात सरकारी आकड्यानुसार चार व्यक्तींच्या उपयोगात येते. प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या घराच्या छपरावरील पाणी विहिरीत मुरवले तर भविष्यात कधी पाणी टंचाई भासणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजस्थानमध्ये रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची देशाला अत्यंत गरज असल्याचे मत प्रकट केले. त्याच धर्तीवर रमाकांत लोधे यांनी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ स्वत:च्या घरी करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. तसेच दुसऱ्या इमारतीवरील पाणीसुद्धा दुसऱ्या विहिरीत सोडण्याचा उपक्रमही केला असल्याने त्यांच्या या प्रयोगाचे अनेकांनी अनुकरण करावे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर आपण मात करू शकतो. (वार्ताहर)