शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आगमनातच पावसाचे बहिर्गमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:45 IST

खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पाऊस आलाही. मात्र आगमनात पावसाने अचानक बहिर्गमन केले आहे.

ठळक मुद्देबळीराजाची आभाळाकडे नजर : पाऊस बेपत्ता झालाय हो....

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पाऊस आलाही. मात्र आगमनात पावसाने अचानक बहिर्गमन केले आहे. आता पाऊस अनेक दिवस तोंड दाखविणार नाही, असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. पाराही पुन्हा ४० अंशापार जाऊ लागला आहे.हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे. जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्टयातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकºयावर अरिष्ट ओढवले होते. शेतकऱ्यांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो.परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. नियोजनही तयार केले आहे. यात जिल्ह्यात एकूण चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकांची लागवड केली जाणार आहे. मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. यावेळी पुन्हा कृषी विभागाने पेरणी क्षेत्र वाढविले आहे. शेती व्यवसाय सध्या शेतकऱ्यांना परवडणारा राहिलेला नाही. मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे. नागरणी, वखरणी, शेतात शेणखत टाकणे, कुंपण तयार करणे, अनावश्यक झुडुपे हटविणे आदी कामे झाली आहेत.आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसणार, अशी खूशखबर हवामान खात्याने दिली होती. त्यामुळे शेतकरी खूश होता. अंदाजाप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला. मात्र तो मान्सून नव्हता. त्यामुळे आगमनानंतर एक-दोन दिवसातच तो गायब झाला आहे. आता पुन्हा कडाक्याचे ऊन्ह तापू लागले आहे.पारा पुन्हा ४० अंशावरपाऊस अचानक गायब झाला आहे. हवामान खाते, नासा यांचे अंदाज कुठे गेले काही कळायला मार्ग नाही. मागील तीन दिवसात पाऊस आला नाही. उलट उष्णतामानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गुरुवारी चंद्रपुरात ४० अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. आणखी तापमानात वाढ झाल्यास उन्हाळ्याचे दिवस परत येतील, अशी भीती चंद्रपूरकरांना लागली आहे. अनेक गावात पाणी टंचाईदेखील निर्माण होईल.आणखी काही दिवस पावसाची विश्रांती ?१२ जूनपासून २२ जूनपर्यंत पाऊस गायब असेल, अशा आशयाचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती खुंटणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात चक्रीवादळे निर्माण झाल्यामुळे ढग तिकडे ओढले जात असल्याचे या मॅसेजमध्ये नमूद आहे. हा मॅसेज खरा की खोटा हे हवामान खाते ठरविलच. मात्र सध्या या मॅसेजमुळे शेतकऱ्यांच्या मनातील धडधड वाढली आहे.अनेकांनी केली पेरणीजिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी थोडाफार मान्सूनपूर्व पाऊस बरसताच पेरणी करून टाकली आहे. ज्यांची बागायची शेती आहे, ते सिंचनाद्वारे आपली पेरणी वाचवू शकतील. मात्र कोरडवाहू शेतात पेरणी झाली असेल तर ती व्यर्थ जाणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस