शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक ...

ठळक मुद्देचिंता वाढली : शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक पाऊस बेपत्ता असल्याने पेरणी केलेले बियाणे अंकुरण्यापूर्वीच करपण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत.जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, धान, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने पेरणीची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या पेरण्या वाया जातात की काय, अशी भिती आता निर्माण झाली आहे. हवामान खात्यानुसार जुनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकणार होते. मात्र पावसाने दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून आता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.चिमूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकटचिमूर : तालुक्यात ७ जूनला झालेल्या पावसाने तालुक्यातील खडसंगी, आमडी, बोथली, रेगाबोडी, भिवंकुड आदी गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकाची लागवड केली. काही प्रमाणात कापूस व सोयाबीनची बियाणे उगवली. मात्र पावसाची दडी व कडक उन्ह तापत असल्याने उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येणार आहे.शेतकऱ्यांची निराशाचतोहोगाव : चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी यावर्षीही शेतकऱ्यांची निराशाच होणार असल्याचे संकेत पावसाच्या दडीवरून दिसून येत आहेत. पहिल्याच दमदार पावसाने अनेकांनी पेरणी केली. मात्र आता बियाणे करपून जाण्याची भिती आहे. गतवर्षी बोंडअळी व मावातुडतुडा रोगाने शेतकºयांना बेजार केले. यावर्षी पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होणार आहे.पेरणीचा खर्च वाया जाणारआयुधनिर्माणी : पहिल्याच पावसाने अनेक शेतकरी आनंदीत होत बियाण्यांची पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारली असून दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे उसणवारीवर किंवा कर्ज काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.बल्लारपूर तालुक्यात ७० टक्के पेरणीबल्लारपूर : पावसाचा अंदाज न घेता पहिल्याच पावसाने आनंदित होवून बल्लारपूर तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. मात्र आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २३ जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असून अनेकांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.बियाणे करपण्याच्या मार्गावरघोसरी : मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने महागडी बियाण्यांची पेरणी केली. परंतु, पावसाच्या दडीने व तप्त उन्हामुळे बियाणे अंकुरण्याआधीच जमिनीतच करपण्याच्या मार्गावर आहेत. मृगाच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले. मात्र आता पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बियाणे करपू नये यासाठी आईल इंजिनद्वारे पाणी देत आहेत.