शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक ...

ठळक मुद्देचिंता वाढली : शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक पाऊस बेपत्ता असल्याने पेरणी केलेले बियाणे अंकुरण्यापूर्वीच करपण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत.जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, धान, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने पेरणीची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या पेरण्या वाया जातात की काय, अशी भिती आता निर्माण झाली आहे. हवामान खात्यानुसार जुनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकणार होते. मात्र पावसाने दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून आता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.चिमूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकटचिमूर : तालुक्यात ७ जूनला झालेल्या पावसाने तालुक्यातील खडसंगी, आमडी, बोथली, रेगाबोडी, भिवंकुड आदी गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकाची लागवड केली. काही प्रमाणात कापूस व सोयाबीनची बियाणे उगवली. मात्र पावसाची दडी व कडक उन्ह तापत असल्याने उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येणार आहे.शेतकऱ्यांची निराशाचतोहोगाव : चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी यावर्षीही शेतकऱ्यांची निराशाच होणार असल्याचे संकेत पावसाच्या दडीवरून दिसून येत आहेत. पहिल्याच दमदार पावसाने अनेकांनी पेरणी केली. मात्र आता बियाणे करपून जाण्याची भिती आहे. गतवर्षी बोंडअळी व मावातुडतुडा रोगाने शेतकºयांना बेजार केले. यावर्षी पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होणार आहे.पेरणीचा खर्च वाया जाणारआयुधनिर्माणी : पहिल्याच पावसाने अनेक शेतकरी आनंदीत होत बियाण्यांची पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारली असून दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे उसणवारीवर किंवा कर्ज काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.बल्लारपूर तालुक्यात ७० टक्के पेरणीबल्लारपूर : पावसाचा अंदाज न घेता पहिल्याच पावसाने आनंदित होवून बल्लारपूर तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. मात्र आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २३ जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असून अनेकांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.बियाणे करपण्याच्या मार्गावरघोसरी : मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने महागडी बियाण्यांची पेरणी केली. परंतु, पावसाच्या दडीने व तप्त उन्हामुळे बियाणे अंकुरण्याआधीच जमिनीतच करपण्याच्या मार्गावर आहेत. मृगाच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले. मात्र आता पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बियाणे करपू नये यासाठी आईल इंजिनद्वारे पाणी देत आहेत.