शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:36 IST

राजुरा- बामणीदरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुमारे सात वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम अंदाजपत्रक सुरुवातीला आठ कोटी रुपये होते. यात सातत्याने वाढ होत जाऊन आता २८ कोटी झाले आहे. तरीपण बांधकाम अपूर्ण आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. यामुळे बरेचदा अपघात, कंबरेचा व मानेचा त्रास सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देवाढीव अंदाजपत्रकाचे मीटर सुरू : कंत्राटदार व अभियंता यांचे खिसे गरम

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा- बामणीदरम्यान रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुमारे सात वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम अंदाजपत्रक सुरुवातीला आठ कोटी रुपये होते. यात सातत्याने वाढ होत जाऊन आता २८ कोटी झाले आहे. तरीपण बांधकाम अपूर्ण आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे. यामुळे बरेचदा अपघात, कंबरेचा व मानेचा त्रास सोसावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदाराकडून दंड वसूल करून गप्प बसत आहे. आम जनतेस होणाऱ्या त्रासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी कंत्राटदाराच्या हिताचे वाढीव अंदाजपत्रक तयार केले जात नसल्याने शासनाची तिजोरी खाली होत आहे.महाराष्टÑ राज्यातून तेलंगणा, मद्रास, बेंगलोर, हैद्राबादकडे जाणाºया हा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारे ट्रक व इतर वाहन जाणे-येणे करतात. या रेल्वे मार्गाने दररोज २०० ते २५० रेल्वे गाड्या जातात. त्यामुळे दर १५ मिनिटात रेल्वे गेट बंद होतो. त्यावेळेस शेकडो वाहने दोन्ही बाजूला उभे राहतात. रेल्वे गेट उघडताच वाहन काढताना वाहतूक कोंडी होते. त्यात बराच वेळ वाया जातो.तेवढ्यात दुसरी रेल्वे गाडी येते आणि वाहतूक थांबवून गेट बंद केले जाते. त्यात वाहनचालक वैतागून जातात.सुमारे पाच वर्षापासून मार्च- डिसेंबरपर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. परंतु ते स्वप्न साकार होण्यास पुन्हा किती वर्ष लागणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास दोन वर्ष पुन्हा त्रास सहन केल्याशिवाय पर्याय नाही, असे कुंभकर्णी झोपेतील अभियंत्यांच्या कार्य पद्धतीवरुन दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.वळण रस्त्याचे निकृष्ट बांधकामरेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ६०० मीटर लांब वळण रस्ता तयार करण्यात आला. सुरुवातीला यावर अंदाजपत्रकानुसार ६२ लाख रुपये खर्च करण्यात आले. अंदाजपत्रक तयार करताना वाहनाची संख्या, क्षमता व बांधकामाचा कालावधी यानुसार वळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु पावसाच्या पहिल्याच सरीत खड्डे पडून दरवर्षी वाहतुकीस अयोग्य बनत राहिला. आम जनतेचे ओरडणे सुरु होताच नवीन अंदाजपत्रक तयार केले जात होेते. व थातूर मातूर नियमबाह्य दुरुस्ती करुन कंत्राटदाराच्या घशात रक्कम टाकली जात होती. यावर्षी पावसात पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती नोव्हेंबरमध्ये करण्यात आली. आणि अवघ्या १५ दिवसात रस्ता उखडला आणि आता नुकतेच पुन्हा दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे. तीसुद्धा नियमबाह्य असल्यामुळे पावसाच्या पहिल्या झटक्यात उखडून निश्चित खड्डे पडणार आहे. दुरुस्ती करताना चौकोन खोदण्यात आले नाही. चार इंचेचे खोल लेवल करण्यात आले नाही. खड्ड्याची सफाई करुन लेवल न करता थातूरमातूर गिट्टी टाकून डांबराचा छिडकाव केल्यामुळे पावसापूर्वी निश्चित उखडून खड्डे पडणार असल्याचे सेवानिवृत्त बांधकाम कर्मचाºयांकडून खात्री देण्यात येत आहे. त्यामुळे पावसात दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूकदाराच्या नशिबी खड्डयातून वाहन चालवित प्रवास करावा लागणार आहे. यात अभियंता व कंत्राटदाराचे अंदाजपत्रकाचे मीटर चालू राहणार असून आतापर्यंत अंदाजे एक कोटी २० लाख रुपये वळण रस्त्यावर शासनाने खर्च केले आहे. तरीही खड्ड्याचा वळण रस्ता ही शोकांतिका कायम आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची गरज आहे. दुरुस्तीचा देखावा करुन बिल पास करणाºया अभियंत्यांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.