शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आरोग्य सेवा शासनाच्या रडारवर

By admin | Updated: March 21, 2015 01:31 IST

ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्यात शासकीय आरोग्य संस्थाचा मोठा वाटा आहे. मात्र या

शासनाची कायापालट योजना : प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर नोडल अधिकारी ठेवणार लक्ष चंद्रपूर : ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्यात शासकीय आरोग्य संस्थाचा मोठा वाटा आहे. मात्र या संस्थाची दुरवस्था झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज व लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने ‘कायापालट योजना’ सुरू केली. या योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर आता नोडल अधिकारी लक्ष ठेवणार आहे. काही शासकीय आरोग्य संस्थामध्ये अनाधिकृतरीत्या वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. त्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर अनिष्ट परिणाम पडतात. औषध साठा राहत नाही. अशावेळी रूग्णांची गैरसोय होते. त्यामुळे औषधसाठा पुरेशा प्रमाणात ठेऊन आवश्कतेनुसार त्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. आरोग्य संस्थाचे सुशोभिकरण व बळकटीकरण करून जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कायापालट योजना असून प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने त्यांच्या मूळ पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडून संबंधित जिल्ह्याला वेळोवेळी भेटी देणे आवश्यक राहणार आहे. संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून आरोग्य सेवा सुधारण्यासाठी समन्वय साधणे हे त्यांचे काम राहणार आहे. तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विषयक वृत्तपत्र, वाहिन्यांद्वारे येणाऱ्या बातम्यांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करणे, संबधीत वृत्तसंस्थेस खुलासा करण्याची व्यवस्था करणे, संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याला पार पाडावी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सुरेश तांबे जिल्ह्याचे नोडल अधिकारी४चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. सुरेश तांबे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. डॉ. तांबे हे पुणे येथे (कुटुंब कल्याण विस्तार, जाहिरात व प्रसिद्धी) उपसंचालक आहेत. त्यांच्या देखरेखीत जिल्ह्यातील आरोग्यसेवा चालणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना आरोग्यसेवेसाठी होत हेळसांड दूर होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.