शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे रबी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात । महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाने हजेरी दिल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धानाचे पोते भिजलेतळोधी बा.: नागभीड तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत ठेवलेल्या शेतकºयांचे धानाचे पोते भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी परिसरातील शेतकऱ्यांनी धानाला भाव मिळावा, याकरिता मोठ्या प्रमाणात धानाचे पोते कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत आणले होते. मात्र व्यापारी कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेवर धानाचे पोते बाजार समिती व सोसायटीमध्येच ठेवले. अशातच शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे धानाचे सर्व पोते भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची चिंता वाढलीशंकरपूर : शुक्रवारी सकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता वाढवली. या परिसरातील काही गावांच्या रस्त्यावर पाणी साचले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रबी पिके संकटात आली आहे. हरभरा, मिरची, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगराई पसरत आहे. कृषी विभागाने यावर सल्ला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.लाखोळी, गहू, हरभरा धोक्यातसिंदेवाही : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. धान, गहू, लाखोळी, हरभा आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने पिकांचे प्रंचड नुकसान झाले. त्यामुळे आधारभूत केंद्रात बाहेर ठेवलेले धान ओले झाले. सिंदेवाही तालुक्यात भाजीपाला उत्पादन केले जाते. या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले. गहु, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र असेच वातावरण राहिल्यास पीक मिळणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.

टॅग्स :Rainपाऊस