शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

अवकाळी पावसामुळे रबी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात । महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाने हजेरी दिल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धानाचे पोते भिजलेतळोधी बा.: नागभीड तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत ठेवलेल्या शेतकºयांचे धानाचे पोते भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी परिसरातील शेतकऱ्यांनी धानाला भाव मिळावा, याकरिता मोठ्या प्रमाणात धानाचे पोते कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत आणले होते. मात्र व्यापारी कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेवर धानाचे पोते बाजार समिती व सोसायटीमध्येच ठेवले. अशातच शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे धानाचे सर्व पोते भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची चिंता वाढलीशंकरपूर : शुक्रवारी सकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता वाढवली. या परिसरातील काही गावांच्या रस्त्यावर पाणी साचले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रबी पिके संकटात आली आहे. हरभरा, मिरची, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगराई पसरत आहे. कृषी विभागाने यावर सल्ला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.लाखोळी, गहू, हरभरा धोक्यातसिंदेवाही : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. धान, गहू, लाखोळी, हरभा आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने पिकांचे प्रंचड नुकसान झाले. त्यामुळे आधारभूत केंद्रात बाहेर ठेवलेले धान ओले झाले. सिंदेवाही तालुक्यात भाजीपाला उत्पादन केले जाते. या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले. गहु, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र असेच वातावरण राहिल्यास पीक मिळणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.

टॅग्स :Rainपाऊस