शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:49 IST

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू आणि हरभराचे पीक घेतले जाते.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभरच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन रबी पिकांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय ढगाळ वातावरणात पिकांवर कीडीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभराचे पीक आहे. ते ३२ हजार ५८३ हेक्टर इतके आहे. गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ इतके आहे. ज्वारीचे क्षेत्र सहा हजार ५७३ हेक्टर इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरणीची टक्केवारी कमी होती.अनेक ठिकाणी धान कापणी सुरु होती. कापसाची वेचणीचाही हंगाम सुरु असल्याने रब्बी पिकांची पेरणीची कामे मागे पडली होती. आता धान कापणी पूर्ण झाली आहे. कापूस वेचणीचे कामही आटोपले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रब्बीच्या पेरणीची कामे पूर्ण केली. मात्र आता बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकºयांना बसत आहे.