शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:49 IST

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू आणि हरभराचे पीक घेतले जाते.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभरच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन रबी पिकांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय ढगाळ वातावरणात पिकांवर कीडीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभराचे पीक आहे. ते ३२ हजार ५८३ हेक्टर इतके आहे. गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ इतके आहे. ज्वारीचे क्षेत्र सहा हजार ५७३ हेक्टर इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरणीची टक्केवारी कमी होती.अनेक ठिकाणी धान कापणी सुरु होती. कापसाची वेचणीचाही हंगाम सुरु असल्याने रब्बी पिकांची पेरणीची कामे मागे पडली होती. आता धान कापणी पूर्ण झाली आहे. कापूस वेचणीचे कामही आटोपले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रब्बीच्या पेरणीची कामे पूर्ण केली. मात्र आता बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकºयांना बसत आहे.