शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सिंदेवाहीत पोलिसांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 26, 2015 01:21 IST

पोलीस हा जनतेचा मित्र असतो. त्याला दिवसरात्र कर्तव्यावर डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.

शासनाचे दुर्लक्ष : १० वर्षांपासून प्रस्ताव धूळ खातसिंदेवाही : पोलीस हा जनतेचा मित्र असतो. त्याला दिवसरात्र कर्तव्यावर डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. त्याला आपल्या हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. परंतु सिंदेवाही येथील पोलिसांची निवासस्थाने अतिशय अल्प संख्येत असल्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर भाडे तत्वावर घर घेवून राहावे लागत आहे. त्यातून त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी १० वर्षांपूर्वी बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु तो अद्यापही धूळ खात पडून असल्याने येथील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या रक्षणासाठी सातत्याने झटणाऱ्या पोलिसांना निवासस्थानाअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अस्तित्वात असलेली निवासस्थानेही जीर्ण झाले आहेत. सुमारे १० वर्षांपूर्वी बांधकाम विभागाच्यावतीने पोलिसांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र १० वर्षानंतरही त्याला मंजुरी मिळाली नाही. जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण करून त्याचे विवरण विवरण मागून जवळपास दहा वर्षाचा कालावधी झाला. पण आतापर्यंत येथे एकही नवीन निवासस्थान उभे झाले नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. सिंदेवाही पोलीस विभागाअंतर्गत गावांची संख्या वाढविण्यात आली. पण पोलीस बळवाढविण्यात आले नाही. पोलीस ठाणे परिसरातील निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत. पावसाळ्यात ही निवासस्थाने गळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागतो. अपुऱ्या निवासस्थानामुळे सर्व पोलिसांना निवासस्थान मिळत नाही. येथे पाच पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकरिता निवासस्थाने होणे गरजेचे आहे. सध्यस्थितीत केवळ १० ते १२ निवासस्थाने अस्तित्वात आहेत. दोन अधिकाऱ्यांची राहण्याची सोय आहे. शासनाने त्वरित नादुरुस्त निवासस्थानांची दुरूस्ती करावी व नवीन निवासस्थानांचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)