शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

आचारसंहिता संपली तरीही नोकरभरतीचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

रोजगाराची प्रतीक्षा : उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली नोकरभरती सुरु झाली. त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अधीपासून संपूर्ण राज्यात विविध शासकीय कार्यालयामधील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हा परिषदेमध्येही मोठ्या प्रमाणात पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली. स्थानिक तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांनी आॅनालईन पध्दतीने अर्ज सादर केले होते. पुढील प्रक्रिया सुरू होणार तेवढ्यात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा रखडला. लेखी परीक्षा, मुलाखतीकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल आणि भरतीचा पुढील टप्पा सुरू होईल, अशी अपेक्षा या उमेदवारांना होती. प्रत्यक्षात आचारसंहिता संपुष्टात येईल २० दिवस उलटून गेले आहेत. परंतु, रखडेली भरती प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही.राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या काळात काम पाहणार आहेत. ही राजवट जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही, तो पर्यंत कायम राहणार आहे. म्हणजेच या काळात सर्वच कामे रखडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा नवीन सरकार स्थापन होण्याच्या प्रतीक्षेत अडकल्याचे चित्र आहे. राज्यात नवे सरकार स्थापना होऊन जनतेच्या आशा, अपेक्षांची पूर्तता व्हावी, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, राष्ट्रपती राजवट केव्हा संपुष्टात येईल, हे सांगणे तूर्तास कठीण आहे. मात्र, बेरोजगार तुरूणांना मोठ्या अपेक्षेने अर्ज केले. त्याची तयारीसुद्धा सुरु केली. मात्र परीक्षा व मुलाखत रोजगार कधी होणार, असा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे.पाचशे ते हजार परीक्षा शुल्कशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध पदभरतीसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येते. पूर्वीच युवक बेरोजगार आहेत. त्यातही मोठे परीक्षा शुल्क, अर्ज करण्यास अतिरिक्त खर्च, परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेगळा खर्च असा एका अर्जासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येत असल्यामुळे अर्ज भरण्यास मोठी अडचण जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक