शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

आचारसंहिता संपली तरीही नोकरभरतीचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

रोजगाराची प्रतीक्षा : उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली नोकरभरती सुरु झाली. त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजगारांमध्ये भरतीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अधीपासून संपूर्ण राज्यात विविध शासकीय कार्यालयामधील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हा परिषदेमध्येही मोठ्या प्रमाणात पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली. स्थानिक तसेच जिल्ह्यातील बेरोजगारांनी आॅनालईन पध्दतीने अर्ज सादर केले होते. पुढील प्रक्रिया सुरू होणार तेवढ्यात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा रखडला. लेखी परीक्षा, मुलाखतीकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल आणि भरतीचा पुढील टप्पा सुरू होईल, अशी अपेक्षा या उमेदवारांना होती. प्रत्यक्षात आचारसंहिता संपुष्टात येईल २० दिवस उलटून गेले आहेत. परंतु, रखडेली भरती प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही.राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या काळात काम पाहणार आहेत. ही राजवट जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही, तो पर्यंत कायम राहणार आहे. म्हणजेच या काळात सर्वच कामे रखडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीचा पुढील टप्पा नवीन सरकार स्थापन होण्याच्या प्रतीक्षेत अडकल्याचे चित्र आहे. राज्यात नवे सरकार स्थापना होऊन जनतेच्या आशा, अपेक्षांची पूर्तता व्हावी, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, राष्ट्रपती राजवट केव्हा संपुष्टात येईल, हे सांगणे तूर्तास कठीण आहे. मात्र, बेरोजगार तुरूणांना मोठ्या अपेक्षेने अर्ज केले. त्याची तयारीसुद्धा सुरु केली. मात्र परीक्षा व मुलाखत रोजगार कधी होणार, असा प्रश्न बेरोजगार युवकांना पडला आहे.पाचशे ते हजार परीक्षा शुल्कशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध पदभरतीसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येते. पूर्वीच युवक बेरोजगार आहेत. त्यातही मोठे परीक्षा शुल्क, अर्ज करण्यास अतिरिक्त खर्च, परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेगळा खर्च असा एका अर्जासाठी दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येत असल्यामुळे अर्ज भरण्यास मोठी अडचण जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक