शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चंद्रपूर जिल्ह्यात परिक्षेआधीच विद्यार्थ्यांच्या हाती येते प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:42 IST

वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे.

ठळक मुद्देवरोरा येथे एकाच विषयाची परीक्षा दोन वेगळ्या वेळांमध्येसकाळच्या सत्रातील विद्यार्थी दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना देता प्रश्नपत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा येथे शालांत परीक्षेच्या विविध शाळेच्या प्रश्नपत्रिका एकच असताना वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेतली जात असल्याने पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे.वरोरा शहर व ग्रामीण भागामध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. इयत्ता पाचवी ते सातवीचा पेपर सकाळच्या सत्रात तर आठवी व नवव्या वर्गाचा पेपर दुपारच्या सत्रात घेण्यात येत आहे. यामध्ये वरोरा शहरातील कर्मवीर विद्यालय व लोकमान्य विद्यालयाने परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक संघाकडून घेतल्या आहेत. दोन्ही विद्यालयाच्या प्रश्नपत्रिका एकच असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा पेपर एकाच वेळेत घेणे अनिवार्य होते. मात्र दोन्ही शाळा वेगवेगळ्या वेळेत परीक्षा घेत आहेत.ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका घेण्याकरिता दुपारच्या सत्रात परीक्षा देणारे विद्यार्थी प्रतिक्षा करीत असतात. सकाळ सत्रात पेपर सोडवारे विद्यार्थी दुपार सत्रात परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका देत असल्याने त्यांना आधीच प्रश्नोत्तरे माहित होत आहेत. यात अनेक विद्यार्थी गैरमार्गाचाही अवलंब करीत असल्याचे दिसून आले आहे.मुख्याध्यापक संघाकडून प्रश्नपत्रिका घेत असताना एकाच वेळी परीक्षा घेण्याचे भान शाळांना असू नये, याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात केली जात आहे. शाळेच्या शिक्षकांनीच प्रश्न पत्रिका काढण्याचे शासनाचे निर्देश असताना, या निर्देशाला हरताळ फासण्यात आली आहे.शहरातील शाळांच्या परीक्षा वेळापत्रकात तफावत आहे. याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी नियोजन करणे गरजेचे आहे.- पुरुषोत्तम रासेकर,अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ वरोरा.

टॅग्स :examपरीक्षा