शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

१६९ जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न; भूस्खलन घटनेला दोन वर्षे पूर्ण लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:15 IST

Chandrapur : सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन मात्र दोन वर्षे लोटूनही पुनर्वसन झाले नसल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी मजबूर

लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : येथील अमराही वार्डमधील भूस्खलनच्या घटनेला सोमवार (दि. २६) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. धोकादायक परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या १६९ नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. वेकोलीने त्या बाधित कुटुंबीयांना दीड वर्ष ३ हजार रुपये किराया दिला. त्यानंतर बंद केल्याने आता ते कुटुंब परत त्या परिसरात वास्तव्यासाठी गेले आहे. मात्र, पुन्हा अशी घटना झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न कायम आहे.

दोन वर्षांपूर्वी २६ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी अमराही वार्डात भूस्खलन झाले. गजानन मडावी यांचे घर ६०-७० फूट भूगर्भात गेले. परिसरात हाहाकार माजला. त्या परिसरातील कुटुंबीयांना तत्काळ अन्यत्र हलविण्यात आले. सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन शासन, प्रशासनाने दिले. पुनर्वसन होईपर्यंत महिन्याकाठी तीन हजार रुपये देण्याचे लोकप्रतिनिधी, तत्कालीन जिल्हाधिकारी व अन्य जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठरले.

दीड वर्षापर्यंत वेकोलीने तीन हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर बंद केल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी गेले. १६९ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वेकोलीच्या शिवनगरला लागून असलेल्या महसूल विभागाच्या सर्व्हे नं. २१/१ मधील ६ एकरांच्या भूखंडाची पाहणी व सीमांकन झाले.

पुन्हा धोका होण्याची शक्यता चंद्रपूर येथे मागील काही दिवसांपूर्वीच अशीच घटना घडली होती. दरम्यान, घुग्घुस येथील घटनेला दोन वर्षे लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनchandrapur-acचंद्रपूर