शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१६९ जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न; भूस्खलन घटनेला दोन वर्षे पूर्ण लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:15 IST

Chandrapur : सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन मात्र दोन वर्षे लोटूनही पुनर्वसन झाले नसल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी मजबूर

लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : येथील अमराही वार्डमधील भूस्खलनच्या घटनेला सोमवार (दि. २६) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. धोकादायक परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या १६९ नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. वेकोलीने त्या बाधित कुटुंबीयांना दीड वर्ष ३ हजार रुपये किराया दिला. त्यानंतर बंद केल्याने आता ते कुटुंब परत त्या परिसरात वास्तव्यासाठी गेले आहे. मात्र, पुन्हा अशी घटना झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न कायम आहे.

दोन वर्षांपूर्वी २६ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी अमराही वार्डात भूस्खलन झाले. गजानन मडावी यांचे घर ६०-७० फूट भूगर्भात गेले. परिसरात हाहाकार माजला. त्या परिसरातील कुटुंबीयांना तत्काळ अन्यत्र हलविण्यात आले. सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन शासन, प्रशासनाने दिले. पुनर्वसन होईपर्यंत महिन्याकाठी तीन हजार रुपये देण्याचे लोकप्रतिनिधी, तत्कालीन जिल्हाधिकारी व अन्य जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठरले.

दीड वर्षापर्यंत वेकोलीने तीन हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर बंद केल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी गेले. १६९ नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वेकोलीच्या शिवनगरला लागून असलेल्या महसूल विभागाच्या सर्व्हे नं. २१/१ मधील ६ एकरांच्या भूखंडाची पाहणी व सीमांकन झाले.

पुन्हा धोका होण्याची शक्यता चंद्रपूर येथे मागील काही दिवसांपूर्वीच अशीच घटना घडली होती. दरम्यान, घुग्घुस येथील घटनेला दोन वर्षे लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनchandrapur-acचंद्रपूर