शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:22 IST

बल्लारशाह रेल्वे स्थानकाची सीमा दक्षिण भारताला जोडणारी आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन येथे असून येथे एकूण पाच फलाट आहेत.

ठळक मुद्देरेल्वे म्हणते निधी नाही : पूल जीर्ण झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकाची सीमा दक्षिण भारताला जोडणारी आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन येथे असून येथे एकूण पाच फलाट आहेत. रेल्वे प्रवाशांना फलाटावर ये-जा करण्यासाठी लोखंडी पूल आहे. मात्र सदर पूल जीर्र्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांचा जीवाला धोका आहे. असे असतानाही रेल्वे प्रशासन निधीचा तुटवडा दर्शवून याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे बल्लारशाह रेल्वे पुलाचा प्रश्न रेंगाळला आहे.येथील रेल्वेस्थानक दरम्यान जुन्या वस्तीला जोडणाऱ्या रेल्वेच्या लोखंडी पुलाची देखील अशीच अवस्था झाली आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने या रेल्वे पुलाची डागडुजी करण्यासाठी दोन ते तीन दिवस पादचाºयांसाठी बंद ठेवला होता. परिणामी ये-जा करणाºया नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणतीही सूचना देण्याचे सौजन्य दाखविले नव्हते.विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या दिवसात वर्धा नदीला पूर आल्यास हाच पूल ये-जा करणाऱ्यांना उपयुक्त ठरतो. फलाटावर ये-जा करणारा व वस्ती विभागाला जोडणारा जुना लोखंडी पूल कालबाह्य अवस्थेत आहे. येथील रेल्वे स्थानकावर पाच फलाट असल्याने एकाच वेळेत दोन ते तीन प्रवाशी रेल्वे आल्यास प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पुलावरुन लोकांचा लोंढा वाहतो. परिणामी अपघाताची शक्यता बळावली असून दुघर्टना घडू शकते.हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबई येथील घटनेची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वग अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगून येथील रेल्वे पुलांचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी आहे.८० वर प्रवासी गाड्यांचे अवागमनबल्लारशाह रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे सर्वच प्रकारच्या प्रवाशी रेल्वेचा थांबा आहे. प्रवासी रेल्वेच्या अवागमनामुळे येथील रेल्वे स्थानकाचा विस्तार होणे आवश्यक आहे. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, प्रवाशी गाड्या, राजधानी एक्स्प्रेससह जवळपास ८० च्या वर प्रवासी गाड्याचे येथून आवागमन असते. काही साप्ताहिक एक्स्प्रेस असल्या तरी येथील रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्या दृष्टीने प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणे क्रमप्राप्त आहे. मात्र रेल्वे प्रशासनातील अधिकारी निधीची कमतरता दर्शवून सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबित आहेत.बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील जुना पूल कालबाह्य झाला. नवीन पुलाचे बांधकाम आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांना निवेन सादर करुन पाठपुरावा करण्याची विनंती केली. याबाबत झेडआरयुसीसी व डीआरयुसीसी सभेतही प्रश्न मांडला. मात्र निधीचा अभाव दर्शवून रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी नवीन पुलाचे बांधकाम गरजेचे आहे.- श्रीनिवास सुंचूवारअध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोशिएशन, बल्लारपूर .