शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कालव्याच्या कामामुळे पाईललाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:04 IST

मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देपाच गावांचा पाणीपुरवठा ठप्प : महिलांची पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील चिचाळा व परिसरातील आठ गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून २४ कोटी रुपये खर्च करुन चंद्रपूर पाटबंधारे विभागाच्या वतीने असोलामेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतील पाणी देण्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार असली तरी या कामांमुळे पाणी पुरवठयाची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चालविल्या जाणाºया बोरचांदली योजनेतील पाच गावांचा पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. महिलांना पाण्यासाठी विनाकारण भटकंती करावी लागत आहे.उन्हाळ्यात पाणी समस्या भेडसावू नये म्हणून जि.प.चे अधिकारी प्रयत्नरत आहेत. मात्र दोन्ही विभागाच्या अधिकाºयात योग्य समन्वय नसल्याने पाईप फुटण्याचे प्रमाण वाढतच आहे. परिणामी महिलांसाठी पाणी समस्या उग्ररुप धारण करीत आहे.जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत मूल तालुक्यात तीन योजना कार्यान्वित आहेत. बोरचांदली योजनेंतर्गत १५ गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र भूमिगत पाईपलाईनच्या कामामुळे पाईपलाईन फुटत असल्याने चिचाळा, ताडाळा, हळदी, दहेगाव, मानकापूर आदी गावातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.ऐन उन्हाळ्यात अशी स्थिती उद्भवल्याने नागरिक त्रस्त आहेत. संबधित गावातील पाणी समस्या लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कंत्राटदार व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम पुर्णत्वास न्यावे व पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाचही गावातील महिलांनी केली आहे.हातपंपही नादुरुस्तउन्हाळ्याचे दिवस सुरु असून पाण्यासाठी महिला वणवण भटकंती करीत आहेत. संबधित गावात विहीर व बोअरवेलची संख्या तोकडी आहे. तर काहींचे पाणी पिण्यासारखे नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली असल्याने व काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक