शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बँकेअभावी ग्रामीणचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली.

ठळक मुद्देयोजनांचे अनुदान घेताना अडचणी : देवाडा परिसरातील २५ गावांची आर्थिक कोंडी

शंकर मडावी ।आॅनलाईन लोकमतदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. परिणामी, २५ गावांतील नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. व्यवहार करण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किमी अंतरावरील राजुरा शहरात जावे लागत आहे.देवाडा गावाची लोकसंख्या चार हजारांपेक्षा अधिक असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क येतो. कोष्टाळा, लक्कडकोट, आनंदगुडा, खिर्डी, पारधीगुडा, सिद्धेश्वर, सोंडो, सोनुर्ली, भेंडाळा, बेरडी, देवापूर, काकळघाट, मोर्लीगुडा, येरगव्हाण, कावळगोंदी, भेंडची, सोनापूर, गेरेगुडा आदी गावांतील नागरिक देवाडा येथील बाजारपेठावरच अवंलबून आहेत. रविवारी येथे मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार सुरू आहे. परंतु राष्टÑीयीकृत बँक नसल्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी राजुरा येथे जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. महिला बचतगटांना दरमहा रक्कम उचल करणे आणि भरण्यासाठी बँकेत जावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, नवीन कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून दरमहा रक्कम घेण्याकरिता राजुरा येथे दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसतो. शासनाच्या धोरणांमुळे बरीच कामे आॅनलाईन आता झालीत. जनधन योजना, अटल पेंशन योजना, शौचालय बांधकामाचे अनुदान, आदी सर्वच योजनांसाठी बँक खाते अनिवार्य केले. पण, देवाडा येथे बँकच नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराची कामे सोडून शेकडो शेतकरी राजुऱ्यात येत आहेत. देवाडा परिसरात आर्थिक उलाढाल मोठी आहे. बँकेअभावी शासकीय योजनांचाही लाभ घेता येत नाही.कर्मचारी, दुकानदार हैराणकर्मचारी देवाडा परिसरात २५ पेक्षा अधिक गावे येतात. ग्रामपंचायत कार्यालय, आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, पशु चिकित्सा केंद्र, महाविद्यालय, कृषी विभाग, शासकीय रोपवाटीका, वन विभाग शासकीय आयटीआय आणि गावांतील दुकानदारांना बँकेअभावी आर्थिक व्यवहार करता येत नाही. शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.शासकीय योजनांमध्ये अडचणीकेंद्र व राज्य शासनाकडून विकासाच्या विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. बँकच नसल्याने खाते कुठे सुरू करावे, त्यासाठी मागदर्शन कोण करणार, आदी प्रश्न निर्माण झाले. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना अचानक विदर्भ कोकण बँकेची शाखा बंद करून अडचणी वाढविण्यात आल्या .