शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

बँकेअभावी ग्रामीणचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली.

ठळक मुद्देयोजनांचे अनुदान घेताना अडचणी : देवाडा परिसरातील २५ गावांची आर्थिक कोंडी

शंकर मडावी ।आॅनलाईन लोकमतदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. परिणामी, २५ गावांतील नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. व्यवहार करण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किमी अंतरावरील राजुरा शहरात जावे लागत आहे.देवाडा गावाची लोकसंख्या चार हजारांपेक्षा अधिक असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क येतो. कोष्टाळा, लक्कडकोट, आनंदगुडा, खिर्डी, पारधीगुडा, सिद्धेश्वर, सोंडो, सोनुर्ली, भेंडाळा, बेरडी, देवापूर, काकळघाट, मोर्लीगुडा, येरगव्हाण, कावळगोंदी, भेंडची, सोनापूर, गेरेगुडा आदी गावांतील नागरिक देवाडा येथील बाजारपेठावरच अवंलबून आहेत. रविवारी येथे मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार सुरू आहे. परंतु राष्टÑीयीकृत बँक नसल्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी राजुरा येथे जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. महिला बचतगटांना दरमहा रक्कम उचल करणे आणि भरण्यासाठी बँकेत जावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, नवीन कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून दरमहा रक्कम घेण्याकरिता राजुरा येथे दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसतो. शासनाच्या धोरणांमुळे बरीच कामे आॅनलाईन आता झालीत. जनधन योजना, अटल पेंशन योजना, शौचालय बांधकामाचे अनुदान, आदी सर्वच योजनांसाठी बँक खाते अनिवार्य केले. पण, देवाडा येथे बँकच नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराची कामे सोडून शेकडो शेतकरी राजुऱ्यात येत आहेत. देवाडा परिसरात आर्थिक उलाढाल मोठी आहे. बँकेअभावी शासकीय योजनांचाही लाभ घेता येत नाही.कर्मचारी, दुकानदार हैराणकर्मचारी देवाडा परिसरात २५ पेक्षा अधिक गावे येतात. ग्रामपंचायत कार्यालय, आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, पशु चिकित्सा केंद्र, महाविद्यालय, कृषी विभाग, शासकीय रोपवाटीका, वन विभाग शासकीय आयटीआय आणि गावांतील दुकानदारांना बँकेअभावी आर्थिक व्यवहार करता येत नाही. शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.शासकीय योजनांमध्ये अडचणीकेंद्र व राज्य शासनाकडून विकासाच्या विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. बँकच नसल्याने खाते कुठे सुरू करावे, त्यासाठी मागदर्शन कोण करणार, आदी प्रश्न निर्माण झाले. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना अचानक विदर्भ कोकण बँकेची शाखा बंद करून अडचणी वाढविण्यात आल्या .