शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बँकेअभावी ग्रामीणचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली.

ठळक मुद्देयोजनांचे अनुदान घेताना अडचणी : देवाडा परिसरातील २५ गावांची आर्थिक कोंडी

शंकर मडावी ।आॅनलाईन लोकमतदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. परिणामी, २५ गावांतील नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. व्यवहार करण्यासाठी नागरिकांना २५ ते ३० किमी अंतरावरील राजुरा शहरात जावे लागत आहे.देवाडा गावाची लोकसंख्या चार हजारांपेक्षा अधिक असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क येतो. कोष्टाळा, लक्कडकोट, आनंदगुडा, खिर्डी, पारधीगुडा, सिद्धेश्वर, सोंडो, सोनुर्ली, भेंडाळा, बेरडी, देवापूर, काकळघाट, मोर्लीगुडा, येरगव्हाण, कावळगोंदी, भेंडची, सोनापूर, गेरेगुडा आदी गावांतील नागरिक देवाडा येथील बाजारपेठावरच अवंलबून आहेत. रविवारी येथे मोठा बाजार भरतो. अनेक वर्षांपासून हा बाजार सुरू आहे. परंतु राष्टÑीयीकृत बँक नसल्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी राजुरा येथे जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. महिला बचतगटांना दरमहा रक्कम उचल करणे आणि भरण्यासाठी बँकेत जावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज फेडणे, नवीन कर्ज घेणे, बँकेत खाते उघडणे, निराधार, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना बँकेतून दरमहा रक्कम घेण्याकरिता राजुरा येथे दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसतो. शासनाच्या धोरणांमुळे बरीच कामे आॅनलाईन आता झालीत. जनधन योजना, अटल पेंशन योजना, शौचालय बांधकामाचे अनुदान, आदी सर्वच योजनांसाठी बँक खाते अनिवार्य केले. पण, देवाडा येथे बँकच नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराची कामे सोडून शेकडो शेतकरी राजुऱ्यात येत आहेत. देवाडा परिसरात आर्थिक उलाढाल मोठी आहे. बँकेअभावी शासकीय योजनांचाही लाभ घेता येत नाही.कर्मचारी, दुकानदार हैराणकर्मचारी देवाडा परिसरात २५ पेक्षा अधिक गावे येतात. ग्रामपंचायत कार्यालय, आश्रम शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, पशु चिकित्सा केंद्र, महाविद्यालय, कृषी विभाग, शासकीय रोपवाटीका, वन विभाग शासकीय आयटीआय आणि गावांतील दुकानदारांना बँकेअभावी आर्थिक व्यवहार करता येत नाही. शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.शासकीय योजनांमध्ये अडचणीकेंद्र व राज्य शासनाकडून विकासाच्या विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागत आहे. बँकच नसल्याने खाते कुठे सुरू करावे, त्यासाठी मागदर्शन कोण करणार, आदी प्रश्न निर्माण झाले. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना अचानक विदर्भ कोकण बँकेची शाखा बंद करून अडचणी वाढविण्यात आल्या .