शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यात एटीएमद्वारे मिळणार शुद्ध पाणी

By admin | Updated: April 11, 2016 01:02 IST

देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात.

भांगडियांचा उपक्रम : सहा गावात लागणार एटीएम सयंत्रचिमूर : देशात विज्ञानाच्या प्रगतीने व मानवाचा वेळ वाचावा, यासाठी नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येतात. ही एटीएम मशीन आता पैसे काढण्यासाठीच सीमित न राहता शुद्ध पाणीही देणार आहे.जल जीवन आहे मनवाच्या सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. यासाठी शासन नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे गावात नळयोजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. तरीही अनेक भागात नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात पोहचत नाही. यासाठी नेहमीच नागरिकांची ओरड असते.नागरिकांची ही ओरड लक्षात घेऊन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर शहरात एटीएमद्वारे पाणी पुरवठा करण्याचा उपक्रम जिल्ह्यात सर्वप्रथम सुरू केला. आजघडीला चिमूर शहरातील वडाळा येथे हे संयत्र नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहे. हा प्रयोग आमदार भांगडिया यांनी स्वखर्चातून केला होता. एटीएमद्वारे पाणी देण्याचा हा प्रयोग चिमुरातील वडाळा प्रभागात यशस्वी झाल्याने इतर गावातही शुद्ध पाणी पुरवठाची एटीएम योजना पोहोचवावी म्हणून त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सहा गावांत ही योजना मंजूर केली आहे.चिमूर तालुक्यातील अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा आजही होत आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या या पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळावी याकरीता तालुक्यातील खडसंगी, मोटेगाव, तळोधी (बा), मासळ, जांभुळघाट व आंबोली या गावात शुद्ध पाण्याच्या एटीएम मशीन लागणार आहेत. यासाठी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून ३५ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर करम्यात आला आहे. त्यामुळे या सहा गावातील नागरिकांना एटीएमद्वारे शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.गावातील पाण्याच्या स्त्रोतातून पाणी एटीएम मशीनमध्ये घेवून त्यामध्ये शुद्ध करण्यात येणार आहे. गावातील इच्छुक नागरिकांना काही ठराविक मासिक शुल्क आकारून एटीएम कार्ड देण्यात येणार आहे. कार्ड टाकताच प्रत्येक नागरिकाला २० ते ३० लिटर पाणी मशीनमधून मिळणार आहे. हे कार्ड दुसऱ्यांदा वापरता येणार नाही. या सयंत्राच्या देखभालीसाठी काही शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे टंचाईत दिलासा मिळणार आहे. (लोकमत चमूू)