शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

‘सीसीआय'कडून राज्यात फक्त १ लाख कापूस गाठींचीच खरेदी; जाचक अटींचा फटका

By राजेश मडावी | Updated: January 20, 2024 17:18 IST

शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदाच नाही

चंद्रपूर : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडून हमीभावाने सर्वाधिक कापूस खरेदी होईल, असे दावे सरकारकडून केले जात होते; मात्र जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांकडे पाठ फिरवली. त्यामुळे आतापर्यंत ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्रात एक लाख कापूस गाठी खरेदीच्या पुढे सीसीआयला जाता आले नाही. शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कमी किमतीत सर्वाधिक कापूस विकल्याने सीसीआय राज्यात मागे पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सीसीआयने १६ जानेवारी २०२४ पर्यंत देशभरात २१ लाख २९ हजार गाठींची खरेदी केली. यामध्ये सर्वाधिक खरेदी तेलंगणा राज्यात तेलंगणा सीसीआयने केली. या आठवड्यात त्या राज्यातील शेतकऱ्यांकडून १६ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. इतर राज्यात केवळ २५ टक्के खरेदी झाली. महाराष्ट्रात फक्त १ लाख गाठी कापूस सीसीआयला खरेदी करता आला. महाराष्ट्रानंतर कापूस उत्पादनात गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असतो; परंतु गुजरातमध्येही सीसीआयची खरेदी केवळ २० हजार गाठींची झाली. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सीसीआयच्या जाचक अटी व शर्तींचा मोठा फटका बसला आहे. या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस हमीभावापेक्षा कमी भावात विकला. सीसीआयने केवळ चार राज्यांमध्ये एक लाख गाठीपेक्षा जास्त कापूस खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे.

कापूस उत्पादन घटूनही भाव कमी

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात सुमारे आठ टक्के घट येण्याचा अंदाज ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीएआय) वर्तवला आहे. महाराष्ट्रात हा अंदाज खरा ठरला आहे. गतवर्षी ३११ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा २९४ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला ६ हजार ८०० ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील महाग कापूस आयात होतो; मात्र येथील शेतकऱ्यांच्या कापसाला जादा दर का मिळू शकत नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

सीसीआयची आतापर्यंत राज्यनिहाय कापूस खरेदी (गाठीमध्ये)

तेलंगणा १५,८६,१००आंध्र प्रदेश १,१७,१००मध्य प्रदेश १,०३,५००महाराष्ट्र १,०१,८००कर्नाटक ५२,७००ओडिशा ५१,५००पंजाब ३७,४००हरयाणा ३४,९००राजस्थान २३,७००गुजरात २०,७००तामिळनाडू ३००इतर २५०