शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

११ बाजार व १२ उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार ...

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी विक्री ठप्प होती. त्यामुळे शेकडो शेतकºयांना शेतमाल विकता आला नाही. बुधवारी बाजार समित्या सुरू होताच विक्रीसाठी शेतकºयांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १२ उपबाजार आहेत. बाजार समित्यांमध्ये ३४१ मापारी ८३१ कमिशन एजंट, १२७१ व्यापारी, १३३ प्रक्रियाकार, ३४१ हमाल कार्यरत आहेत. मूल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, नागभीड, ब्रह्मपुरी येथील बाजार समित्यामध्ये सर्वात मोठ्या आहेत. केंद्र सरकारने केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकºयांचा विरोध असून त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक व अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) विधेयक २००० असे तीन कायदे तयार केले. हे कायदे अन्यायकारक असल्याचा आरोप करून शेतकºयांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. मंगळवारी भारत बंद पुकारल्यानंतर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामस्वरूप, बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद होती. याचा फटका शेतकºयांनाही बसला. बुधवारी चंद्रपूर, मूल, नागभीड, गोंडपिपरी, राजुरा, ब्रह्मपुरी,चिमूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी केली होती.

बॉक्स

दिवसभर दीड कोटींचा व्यवहार ठप्प

खरीप हंगामातील शेतमाल विकण्यासाठी बहुतांश शेतकरी यंदा बाजार समित्यांनाच प्राधान्य देत आहेत. भारत बंदमुळे मंगळवारी शेतमाल खरेदी बंद होती. संसदेला व शेतक-यांना विश्वासात न घेता मागच्या दाराने केंद्र सरकारने कृषी तयार केले. त्यामुळे आंदोलनात सहभाग होणे आपले कर्तव्य समजून शेतक-यांनी मंगळवारी शेतमालच विकला नाही. त्यामुळे मंगळवारी दीड कोटींचा व्यवहार ठप्प झाला होता.

कोट

मंगळवारी शेतक-यांनी भारत बंद पुकारल्याने बाजार बंद होता. थोडा विलंब झाल्याने विक्री करता आली नाही. आम्ही बरेच शेतकरी भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी झालो. पाठींबा दिला. बुधवारपासून बाजार समित्या सुरू झाल्याने अडचण संपली.

-हरीश मुळे, नागभीड

कोट

शेतकरी आंदोलनाची गरजच आहे. मंगळवारी भारत बंद होता. त्यामुळे शेतमाल विकता आला नाही. शेतक-यांनी घरीच शेतमाल ठेवणे पसंत केले होते. बुधवारी खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी विश्वास ठेवतो. थोडा त्रास झाला तरी खुल्या बाजार बाजाराच्या तुलनेत आमचे हक्क कायम आहेत.

-दीपक पिंपळकर, गोवरी