शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

११ बाजार व १२ उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार ...

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी विक्री ठप्प होती. त्यामुळे शेकडो शेतकºयांना शेतमाल विकता आला नाही. बुधवारी बाजार समित्या सुरू होताच विक्रीसाठी शेतकºयांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १२ उपबाजार आहेत. बाजार समित्यांमध्ये ३४१ मापारी ८३१ कमिशन एजंट, १२७१ व्यापारी, १३३ प्रक्रियाकार, ३४१ हमाल कार्यरत आहेत. मूल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, नागभीड, ब्रह्मपुरी येथील बाजार समित्यामध्ये सर्वात मोठ्या आहेत. केंद्र सरकारने केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकºयांचा विरोध असून त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक व अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) विधेयक २००० असे तीन कायदे तयार केले. हे कायदे अन्यायकारक असल्याचा आरोप करून शेतकºयांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. मंगळवारी भारत बंद पुकारल्यानंतर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामस्वरूप, बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद होती. याचा फटका शेतकºयांनाही बसला. बुधवारी चंद्रपूर, मूल, नागभीड, गोंडपिपरी, राजुरा, ब्रह्मपुरी,चिमूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी केली होती.

बॉक्स

दिवसभर दीड कोटींचा व्यवहार ठप्प

खरीप हंगामातील शेतमाल विकण्यासाठी बहुतांश शेतकरी यंदा बाजार समित्यांनाच प्राधान्य देत आहेत. भारत बंदमुळे मंगळवारी शेतमाल खरेदी बंद होती. संसदेला व शेतक-यांना विश्वासात न घेता मागच्या दाराने केंद्र सरकारने कृषी तयार केले. त्यामुळे आंदोलनात सहभाग होणे आपले कर्तव्य समजून शेतक-यांनी मंगळवारी शेतमालच विकला नाही. त्यामुळे मंगळवारी दीड कोटींचा व्यवहार ठप्प झाला होता.

कोट

मंगळवारी शेतक-यांनी भारत बंद पुकारल्याने बाजार बंद होता. थोडा विलंब झाल्याने विक्री करता आली नाही. आम्ही बरेच शेतकरी भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी झालो. पाठींबा दिला. बुधवारपासून बाजार समित्या सुरू झाल्याने अडचण संपली.

-हरीश मुळे, नागभीड

कोट

शेतकरी आंदोलनाची गरजच आहे. मंगळवारी भारत बंद होता. त्यामुळे शेतमाल विकता आला नाही. शेतक-यांनी घरीच शेतमाल ठेवणे पसंत केले होते. बुधवारी खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी विश्वास ठेवतो. थोडा त्रास झाला तरी खुल्या बाजार बाजाराच्या तुलनेत आमचे हक्क कायम आहेत.

-दीपक पिंपळकर, गोवरी