शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

११ बाजार व १२ उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार ...

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी विक्री ठप्प होती. त्यामुळे शेकडो शेतकºयांना शेतमाल विकता आला नाही. बुधवारी बाजार समित्या सुरू होताच विक्रीसाठी शेतकºयांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १२ उपबाजार आहेत. बाजार समित्यांमध्ये ३४१ मापारी ८३१ कमिशन एजंट, १२७१ व्यापारी, १३३ प्रक्रियाकार, ३४१ हमाल कार्यरत आहेत. मूल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, नागभीड, ब्रह्मपुरी येथील बाजार समित्यामध्ये सर्वात मोठ्या आहेत. केंद्र सरकारने केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकºयांचा विरोध असून त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक व अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) विधेयक २००० असे तीन कायदे तयार केले. हे कायदे अन्यायकारक असल्याचा आरोप करून शेतकºयांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. मंगळवारी भारत बंद पुकारल्यानंतर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामस्वरूप, बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद होती. याचा फटका शेतकºयांनाही बसला. बुधवारी चंद्रपूर, मूल, नागभीड, गोंडपिपरी, राजुरा, ब्रह्मपुरी,चिमूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी केली होती.

बॉक्स

दिवसभर दीड कोटींचा व्यवहार ठप्प

खरीप हंगामातील शेतमाल विकण्यासाठी बहुतांश शेतकरी यंदा बाजार समित्यांनाच प्राधान्य देत आहेत. भारत बंदमुळे मंगळवारी शेतमाल खरेदी बंद होती. संसदेला व शेतक-यांना विश्वासात न घेता मागच्या दाराने केंद्र सरकारने कृषी तयार केले. त्यामुळे आंदोलनात सहभाग होणे आपले कर्तव्य समजून शेतक-यांनी मंगळवारी शेतमालच विकला नाही. त्यामुळे मंगळवारी दीड कोटींचा व्यवहार ठप्प झाला होता.

कोट

मंगळवारी शेतक-यांनी भारत बंद पुकारल्याने बाजार बंद होता. थोडा विलंब झाल्याने विक्री करता आली नाही. आम्ही बरेच शेतकरी भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी झालो. पाठींबा दिला. बुधवारपासून बाजार समित्या सुरू झाल्याने अडचण संपली.

-हरीश मुळे, नागभीड

कोट

शेतकरी आंदोलनाची गरजच आहे. मंगळवारी भारत बंद होता. त्यामुळे शेतमाल विकता आला नाही. शेतक-यांनी घरीच शेतमाल ठेवणे पसंत केले होते. बुधवारी खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी विश्वास ठेवतो. थोडा त्रास झाला तरी खुल्या बाजार बाजाराच्या तुलनेत आमचे हक्क कायम आहेत.

-दीपक पिंपळकर, गोवरी