शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पंपधारक शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या राजेश बारसागडे सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर ...

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या

राजेश बारसागडे

सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आली होती. मात्र उर्वरित रोवणीचा हंगाम पंपधारक शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या साहाय्याने उरकविणार असताना ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आल्याने सर्व ठप्प झाले. आता रोवणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला. ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आकापूर येथील शेतकऱ्यांनी सावरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.

तालुक्यातील आकापूर हे गाव जंगल परिसरात आहे. आणि शेतजमिनीही जंगलाला लागूनच आहेत. येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असते. येथील पंपधारक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये अचानक बिघाड आल्याने ऐन रोवणीच्या हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंपधारक शेतकरी चिंताग्रस्त झाले. दरम्यान समस्येचे निकारण करण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सावरगाव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता बोंडे यांच्याशी चर्चा केली आणि ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.

दरम्यान समस्या जाणून घेऊन अभियंता बोंडे यांनी तातडीने समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचीसुद्धा हमी दिली. यावेळी भाकरे गुरुजी, धनराज बावणकर, तळोधी पत्रकार संघांचे सचिव भोजराज नवघडे, माजी सरपंच वेंकय्या भाकरे, तथा पंपधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बॉक्स

अडचणीत पुन्हा भर...

मागील महिन्यात येथील गुराखी खटू कुंभरे याला वाघाने ठार मारले होते. शिवाय वन्यप्राण्याच्या छोट्या-मोठ्या घटना येथे घडतच असतात. येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिवस असो वा रात्री जीव मुठीत धरूनच शेतात जावे लागते. याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भयावह वास्तव असताना वीजपुरवठा खंडित होत असून यामुळे अडचणीत भर पडत आहे.

कोट

काही शेतकऱ्यांचे मोटरपंप बिघडत आहेत. या बाबीला महावितरण कंपनी कारणीभूत आहे. कारण जेवढा विद्युत पुरवठा पाहिजे. तेवढा मिळत नाही. बिल नाही भरले की तातडीने कनेक्शन बंद केले जाते. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाला तर एक-एक महिना तो बंदच राहतो. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

- वेंकय्या भाकरे,

माजी सरपंच,आकापूर, ता. नागभीड