शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पंपधारक शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या राजेश बारसागडे सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर ...

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या

राजेश बारसागडे

सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आली होती. मात्र उर्वरित रोवणीचा हंगाम पंपधारक शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या साहाय्याने उरकविणार असताना ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आल्याने सर्व ठप्प झाले. आता रोवणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला. ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आकापूर येथील शेतकऱ्यांनी सावरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.

तालुक्यातील आकापूर हे गाव जंगल परिसरात आहे. आणि शेतजमिनीही जंगलाला लागूनच आहेत. येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असते. येथील पंपधारक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये अचानक बिघाड आल्याने ऐन रोवणीच्या हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंपधारक शेतकरी चिंताग्रस्त झाले. दरम्यान समस्येचे निकारण करण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सावरगाव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता बोंडे यांच्याशी चर्चा केली आणि ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.

दरम्यान समस्या जाणून घेऊन अभियंता बोंडे यांनी तातडीने समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचीसुद्धा हमी दिली. यावेळी भाकरे गुरुजी, धनराज बावणकर, तळोधी पत्रकार संघांचे सचिव भोजराज नवघडे, माजी सरपंच वेंकय्या भाकरे, तथा पंपधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बॉक्स

अडचणीत पुन्हा भर...

मागील महिन्यात येथील गुराखी खटू कुंभरे याला वाघाने ठार मारले होते. शिवाय वन्यप्राण्याच्या छोट्या-मोठ्या घटना येथे घडतच असतात. येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिवस असो वा रात्री जीव मुठीत धरूनच शेतात जावे लागते. याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भयावह वास्तव असताना वीजपुरवठा खंडित होत असून यामुळे अडचणीत भर पडत आहे.

कोट

काही शेतकऱ्यांचे मोटरपंप बिघडत आहेत. या बाबीला महावितरण कंपनी कारणीभूत आहे. कारण जेवढा विद्युत पुरवठा पाहिजे. तेवढा मिळत नाही. बिल नाही भरले की तातडीने कनेक्शन बंद केले जाते. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाला तर एक-एक महिना तो बंदच राहतो. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

- वेंकय्या भाकरे,

माजी सरपंच,आकापूर, ता. नागभीड