शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पंपधारक शेतकऱ्यांची वीज कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या राजेश बारसागडे सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर ...

ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याने रोवण्या खोळंबल्या

राजेश बारसागडे

सावरगाव : मागील काही दिवसात पावसाने दडी मारली. आणि पावसाअभावी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आली होती. मात्र उर्वरित रोवणीचा हंगाम पंपधारक शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या साहाय्याने उरकविणार असताना ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड आल्याने सर्व ठप्प झाले. आता रोवणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला. ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आकापूर येथील शेतकऱ्यांनी सावरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.

तालुक्यातील आकापूर हे गाव जंगल परिसरात आहे. आणि शेतजमिनीही जंगलाला लागूनच आहेत. येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असते. येथील पंपधारक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफाॅर्मरमध्ये अचानक बिघाड आल्याने ऐन रोवणीच्या हंगामात विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंपधारक शेतकरी चिंताग्रस्त झाले. दरम्यान समस्येचे निकारण करण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सावरगाव येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता बोंडे यांच्याशी चर्चा केली आणि ट्रान्सफाॅर्मरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.

दरम्यान समस्या जाणून घेऊन अभियंता बोंडे यांनी तातडीने समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. लवकरच नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवण्याचीसुद्धा हमी दिली. यावेळी भाकरे गुरुजी, धनराज बावणकर, तळोधी पत्रकार संघांचे सचिव भोजराज नवघडे, माजी सरपंच वेंकय्या भाकरे, तथा पंपधारक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बॉक्स

अडचणीत पुन्हा भर...

मागील महिन्यात येथील गुराखी खटू कुंभरे याला वाघाने ठार मारले होते. शिवाय वन्यप्राण्याच्या छोट्या-मोठ्या घटना येथे घडतच असतात. येथील शेतकऱ्यांना नेहमीच दिवस असो वा रात्री जीव मुठीत धरूनच शेतात जावे लागते. याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भयावह वास्तव असताना वीजपुरवठा खंडित होत असून यामुळे अडचणीत भर पडत आहे.

कोट

काही शेतकऱ्यांचे मोटरपंप बिघडत आहेत. या बाबीला महावितरण कंपनी कारणीभूत आहे. कारण जेवढा विद्युत पुरवठा पाहिजे. तेवढा मिळत नाही. बिल नाही भरले की तातडीने कनेक्शन बंद केले जाते. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाला तर एक-एक महिना तो बंदच राहतो. याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

- वेंकय्या भाकरे,

माजी सरपंच,आकापूर, ता. नागभीड