शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पळसगाव-आमडीचे सिंचन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:29 IST

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देबजेट ७०.३४ कोटींच्या घरात : बल्लारपूर तालुक्यातील मोठा प्रकल्प रखडला

सुरेश रंगारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. कळमना गावाशेजरी असलेल्या वर्धा नदीवर पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाला २००१ मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. प्रत्यक्षात कामाची सुरूवात २००५ पासून झाली. परंतु कामात वेळोवेळी खंड पडल्याने या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आजवर पोहोचले नाही. प्रकल्प लांबला व प्रकल्पाचे बजेट १९ कोटींवरून ७०.३४ कोटीच्या घरात पोहचले. हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाअभावी प्रकल्प रखडला.पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाच्या नियोजनाचे काम सन १९९९ मध्येच सुरू झाले. सन २००१ ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. पण वनजमीन कायदा, भूसंपादन कायद्यामुळे यात खंड पडत गेला. विद्यमान पालकमंत्री व तेव्हाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पळसगाव - आमडी उपसा सिंचनाचे काम सुरू झाले. यात अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला गती दिली. २००९ मध्ये पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली. यात ४.५ हेक्टर शेतजमीन व ११.५० हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पामुळे २७०५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोटी तकूम, कोर्टी मक्ता, आष्टी, कळमना, आमडी, पळसगाव या दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.सुरूवातीला या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया होती. त्यानंतर त्यात बदल करून उर्ध्वनलिका सिंचन प्रकल्प आखण्यात आला. सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर जरी असले तरी शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी पोहचले नाही. ते केव्हा पोहोचणार याबाबत अधिकारी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना शेतकºयांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृगजळ ठरत आहे.पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून चालू आहे. या भागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा फायदा होईल, यात शंका नाही. परंतु या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात बदल करून कोठारी येथील शेतकºयांना लाभ व्हावा, यासाठी नियोजन करावे.-मोरेश्वर लोहेसरपंच ग्राम पंचायत कोठारीअध्यक्ष सरपंच संघटना बल्लारपूर तालुकापुरेशा पाण्याअभावी शेतकºयांच्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना दरवर्षी फटका सहन करावा लागतो. सध्या गावातील शेतकºयांकडे विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांवर शासनाने उपकार करावे.-शंकर खोब्रागडेसरपंच, ग्रामपंचायत पळसगावप्रकल्प दहा वर्षापासून रखडला आहे. काम कासवगतीने सुरू आहे. प्र्रकल्पाचे पाणी शेती सिंचनासाठी लाभदायी असून त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. प्रकल्पाचे पाणी चालु वर्षात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तरच शेतकरी आनंदी होईल.-सुनिल बावणेसरपंच ग्रामपंचायत कळमनाया प्रकल्पामुळे पळसगाव आमडी या भागातील कृषी क्षेत्रात मोठा फरक पडणार असून शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.-अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे