शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

पळसगाव-आमडीचे सिंचन थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:29 IST

बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देबजेट ७०.३४ कोटींच्या घरात : बल्लारपूर तालुक्यातील मोठा प्रकल्प रखडला

सुरेश रंगारी।लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव - आमडी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. कळमना गावाशेजरी असलेल्या वर्धा नदीवर पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाला २००१ मध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. प्रत्यक्षात कामाची सुरूवात २००५ पासून झाली. परंतु कामात वेळोवेळी खंड पडल्याने या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आजवर पोहोचले नाही. प्रकल्प लांबला व प्रकल्पाचे बजेट १९ कोटींवरून ७०.३४ कोटीच्या घरात पोहचले. हा प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाअभावी प्रकल्प रखडला.पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाच्या नियोजनाचे काम सन १९९९ मध्येच सुरू झाले. सन २००१ ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. पण वनजमीन कायदा, भूसंपादन कायद्यामुळे यात खंड पडत गेला. विद्यमान पालकमंत्री व तेव्हाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून पळसगाव - आमडी उपसा सिंचनाचे काम सुरू झाले. यात अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या प्रकल्पाला गती दिली. २००९ मध्ये पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली. यात ४.५ हेक्टर शेतजमीन व ११.५० हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पामुळे २७०५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून बामणी, दुधोली, दहेली, जोगापूर, कोटी तकूम, कोर्टी मक्ता, आष्टी, कळमना, आमडी, पळसगाव या दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे.सुरूवातीला या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया होती. त्यानंतर त्यात बदल करून उर्ध्वनलिका सिंचन प्रकल्प आखण्यात आला. सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर जरी असले तरी शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी पोहचले नाही. ते केव्हा पोहोचणार याबाबत अधिकारी निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना शेतकºयांसाठी वरदान ठरण्याऐवजी मृगजळ ठरत आहे.पळसगाव - आमडी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून चालू आहे. या भागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचा फायदा होईल, यात शंका नाही. परंतु या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात बदल करून कोठारी येथील शेतकºयांना लाभ व्हावा, यासाठी नियोजन करावे.-मोरेश्वर लोहेसरपंच ग्राम पंचायत कोठारीअध्यक्ष सरपंच संघटना बल्लारपूर तालुकापुरेशा पाण्याअभावी शेतकºयांच्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना दरवर्षी फटका सहन करावा लागतो. सध्या गावातील शेतकºयांकडे विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्याने पुरेसे पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांवर शासनाने उपकार करावे.-शंकर खोब्रागडेसरपंच, ग्रामपंचायत पळसगावप्रकल्प दहा वर्षापासून रखडला आहे. काम कासवगतीने सुरू आहे. प्र्रकल्पाचे पाणी शेती सिंचनासाठी लाभदायी असून त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. प्रकल्पाचे पाणी चालु वर्षात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तरच शेतकरी आनंदी होईल.-सुनिल बावणेसरपंच ग्रामपंचायत कळमनाया प्रकल्पामुळे पळसगाव आमडी या भागातील कृषी क्षेत्रात मोठा फरक पडणार असून शेतकऱ्यांना फायदेशीर होईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.-अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे