शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By admin | Updated: November 21, 2015 00:49 IST

महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ....

वर्षपूर्ती घडीपुस्तिका प्रकाशित : विविध योजनांचा घेतला आढावाचंद्रपूर : महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. विकास कामावर आधारीत छायाचित्र असलेली विकासछाया पुस्तिका व एक वर्ष प्रगतीचे विश्वासाचेङ्घया घडी पुस्तिकेच्या प्रकाशनाला वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार शोभाताई फडणवीस, विजय वडेट्टीवार, प्रा. अनिल सोले, नाना शामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, सुरेश धानोरकर, कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. गेल्या वर्ष भरात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची थोडक्यात माहिती या घडी पुस्तिकेत देण्यात आली आहे. तर विकासछाया पुस्तिकेत विकास कामाची छायाचित्र समाविष्ट आहेत. जलयुक्त शिवार, वन विभाग, महाराजस्व अभियान, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग व पीक कर्ज या विषयीची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. वनमंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांनी गेल्या एका वर्षात लोकहिताचे ४२ निर्णय घेतले आहेत. तर जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्यात अतिशय चांगले काम झाले आहे. महाराजस्व अभियानात अनेक लोकांना विविध दाखले वाटप करण्यात आले.सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या एक वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. चंद्रपूर जिल्ह्याचाच विचार करायचा झाल्यास जिल्हा आज विकासाच्या नव्या वळणावर आहे. चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्र, वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, चांदा ते बांदा विकास करण्यासाठी समितीचे गठण, ताडोबाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे, महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत नेमणे, जिल्ह्याच्या विकासात लोकांचा सहभाग घेण्यासाठी ठिकठिकाणी विकास परिषद घेणे, बांबू परिषद, बाबुपेठ उड्डाण पुलासाठी निधी, मॉडेल पोलीस स्टेशन बल्लारपूर, मूल बल्लारपूर शहरात सीसीटीव्ही बसविणे, बस स्थानकाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर शहर विकासाठी निधी उपलब्ध करून देणे, गोसेखुर्दचे पाणी जिल्हयात आणणे, डिसेंबर मध्ये होणारा ताडोबा पर्यटन महोत्सव, बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचानालय, स्वातंत्र्य सैनिकांसाठी आरोग्य शिबिर, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम उद्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ, माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तसाठी निधीत भरपूर वाढ, उद्योगाला चालना देण्यासाठी मेक इन चंद्रपूर असे असंख्य निर्णय एका वर्षाच्या कार्यकाळात घेतले आहेत. वनविभागाला कधी नव्हे ते विकास झोतात आणण्याचे काम या वर्षभरात झाले आहे. वनातील वन उपजापासून महसुल प्राप्त करून देणारी वनधन जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात प्रथमच आखण्यात आली. वनात ३३ प्रकारची वन उपज निर्माण होतात याचा उपयोग वन महसूल वाढविण्यासाठी होऊ शकतो ही बाब ओळखून नागपूर येथे राज्यातील पहिले वनधन जनधन विक्री केंद्र सुरु केले. अशाच प्रकारच्या विक्री केंद्राची साखळी आता राज्यभर निर्माण केली जाणार आहे. बफर क्षेत्रातील वनालगतच्या गावांचा विकास साधणारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना तर गावांचा कायापालट करणारी योजना आहे. या निर्णयाचा या पुस्तिकेत उल्लेख करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)