शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

लोकानुनयासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:02 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा. तुम्ही सतत जम्मू-काश्मीरमधील अशांततेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करता आणि काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून सतत गवगवा करता पण तुमच्या बलुचिस्तानात काय चालले आहे व तेथील जनतेच्या स्वातंत्र्याच्या मागणीचे काय, असा मोदी यांच्या भाषणाचा सूर होता. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान ढवळाढवळ करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा जो भारताचा आरोप आहे तसाच आरोप पाकिस्तानही भारतावर बलुचिस्तानसंबंधी करीत आहे आणि डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या या आरोपावर चर्चा करण्याची तयारी भारताने दाखविलीही होती. तथापि मोदींच्या सोमवारच्या भाषणातील बलुचिस्तानच्या संदर्भावर संपुआ सरकारमधील परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी खरमरीत प्रतिक्रिया देताना बलुचिस्तान हा पाकचा अंतर्गत प्रश्न आहे व त्यावर सार्वजनिक चर्चा करण्याने भारताच्या पाकव्याप्त काश्मीरवरील हक्कास बाधा पोहोचू शकते असे म्हणताक्षणी काँग्रेस पक्षाने खुर्शीद यांना एकाकी पाडून मोदींच्या कथनास पाठिंबा दिला आहे. बलुचिस्तान असो की पाकव्याप्त काश्मीर असो, पाकिस्तान त्या प्रांतात लष्कराचा वापर करुन लोकांच्या हक्कांची पायमल्ली करीत आहे व हा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चेस आणलाच गेला पाहिजे असे स्वच्छ भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. लोकव्यवहारात ज्याला ‘ठोशास ठोसा’ म्हणतात तसाच काहीसा प्रकार मोदींनी केला असला आणि त्याला काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केला असला तरी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये जे सौहार्द निर्माण झाल्याचे म्हटले जाते, त्याचा हा निश्चितच परिणाम नव्हे असा तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. त्यामागे कारण आहे उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे. पाकिस्तानच्या विरोधात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही भूमिकेचे शहरी आणि विशेषत: युवा वर्गातील मतदारांकडून स्वागत होत असते आणि त्यातच मग हिन्दू मतांचे अप्रत्यक्षरीत्या ध्रुवीकरणही होत असते. मोदी आणि भाजपा यांना ते अपेक्षितही असते. लोकानुनय त्यासाठीच असतो. पण आज काँगेसची स्थिती इतकी नाजूक बनली आहे की तिचे परंपरागत मतदार तिच्यापासून दूर गेले असल्याने तिलाही हिंदू मतांची ओढ लागली आहे.