लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेकांचे रोजगार नष्ट झाले आहे. शेतकरी, मजूर, शेतमजूर, छोटे-मोठे व्यावसायिक अशा अनेकांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महावितरणने तीन महिन्यांचे एकित्रत वीज बिल पाठविले. परिणामी जनसामान्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर यांनी उर्जामंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.वीज बिल माफ कराब्रह्मपुरी : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : महावितरणने ग्राहकांना पाठवलेले विद्युत बील माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी भद्रावतीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठवले आहे. निवेदन देताना महाप्रदेश महासचिव कुशल मेश्राम, विजय इंगोले, नगरसेवक सुनील खोब्रागडे, नगरसेवक राहुल चौधरी, विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर आदी उपस्थित होते.
वाढीव वीजबिलामुळे जनतेमध्ये आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणने पाठवलेल्या विद्युत बिलाचा भरणा अशक्य आहे. त्यामुळे सर्व घरगुती विजग्राहकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांनी केली.
वाढीव वीजबिलामुळे जनतेमध्ये आक्रोश
ठळक मुद्देबिल माफ करण्याची मागणी, सामाजिक संघटनेचे निवेदन