शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले.

ठळक मुद्देखरेदीसाठी विक्रेत्यांची गर्दी : तेल, दाळ, तांदूळ, गहूच्या किमती वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली याचाच फायदा घेत ठोक विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ केली. त्यामुळे जनसामान्यांना मोठा फटका बसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णत: बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळू लागली. त्यामुळे मोठ्या व्यापारी, ठोक विक्रेते यांनी तेल, आटा, साखर, तांदूळ, गहूच्या दारात एका किलोमागे पाच ते दहा रुपयापर्यंतची वाढ केली. परंतु, सात दिवस दुकाने बंद राहिल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ग्राहकही अतिरिक्त दर देऊन साहित्यांची खरेदी करीत आहेत.भाजीपाला वधारलाजनता कर्फ्यूची घोषणा होताच बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा ३० रुपये किलोवरुन ६० रुपये किलो, टमाटर ५०, आलू ५०, फुलकोबी १००, वांगे ३० रुपये प्रति किलो विक्रीला होता. प्रत्येक किलोमागे किमान १० ते ३० रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र सात दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने नागरिकांना अडचण जात आहे.मुबलक साठा असूनही वाढजिल्हाबाह्य तसेच आंतरजिल्हा वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच ट्रांसपोर्टींग सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे किराणा वस्तू, भाजीपाला, दैनदिन वापराच्या वस्तूंची आयात निर्यात सुरळीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत सर्व वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र तरीसुद्धा विक्रेते कृत्रिम टंचाई भासूवून अतिरिक्त दराने वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक