शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पीआरटी थांबविणार मानव - वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी :  जंगलालगतच्या गावातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाकडून गावागावात पीआरटी (प्राथमिक बचाव दल) स्थापन करण्यात आले आहे.  यामुळे गावातीलच नागरिकांच्या सहकार्याने व जनजागृतीने येत्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ब्रम्हपुरी वनविभागाची व्याप्ती फार मोठी आहे. वनविभागाची उत्तर व दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. उत्तर वनविभागाचे क्षेत्र जवळपास १४ हजार हेक्टर तर दक्षिण वनविभागाचे क्षेत्र १६ हजार हेक्टर आहे. येथे साग, अंजन, बेहडा, सालई,  मोहगणी, मोह, तेंदू, चार, धावडा, बिना, खैर, हीवर, सैना, शिवण, बांबू आदी वृक्ष आहेत.  येथील वातावरण वन्य प्राण्यांकरिता पोषक असल्याने विविध पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाघ व बिबट मोठ्या  संख्येत आहेत.      मागील पाच वर्षात दोन्ही विभागात जंगलालगतच्या गावांतील  जवळपास २०  नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांवर हल्ले होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाळीव जनावरांचाही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा संघर्ष टाळता यावा, यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने गावागावात पीआरटीची स्थापना केली आहे. 

पीआरटींना दिले जाणार विशेष प्रशिक्षणसंपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

३३ गावात १६५ प्राथमिक बचाव दल३३ गावात प्रत्येकी पाच असे एकूण १६५ पीआरटी स्थापन करण्यात आले आहेत. गावातील नागरिक, गुराखी यांना जंगलात जाण्यापासून थांबविणे, वृक्षतोड थांबविण्यात मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जनजागृतीमुळे मानव - वन्यजीव संघर्ष पीआरटीच्या सहकार्याने टाळता येणार आहे.

मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी वनविभागातर्फे गावकरी व वनविभागामधील दुवा म्हणून प्राथमिक बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळता यावा, जीवितहानी होऊ नये याकरिता केलेला हा एक चांगला प्रयत्न आहे.- पी.एच. ब्राम्हणेवनपरिक्षेत्राधिकारी, उत्तर, ब्रम्हपुरी. 

टॅग्स :forest departmentवनविभाग