शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीआरटी थांबविणार मानव - वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी :  जंगलालगतच्या गावातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाकडून गावागावात पीआरटी (प्राथमिक बचाव दल) स्थापन करण्यात आले आहे.  यामुळे गावातीलच नागरिकांच्या सहकार्याने व जनजागृतीने येत्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ब्रम्हपुरी वनविभागाची व्याप्ती फार मोठी आहे. वनविभागाची उत्तर व दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. उत्तर वनविभागाचे क्षेत्र जवळपास १४ हजार हेक्टर तर दक्षिण वनविभागाचे क्षेत्र १६ हजार हेक्टर आहे. येथे साग, अंजन, बेहडा, सालई,  मोहगणी, मोह, तेंदू, चार, धावडा, बिना, खैर, हीवर, सैना, शिवण, बांबू आदी वृक्ष आहेत.  येथील वातावरण वन्य प्राण्यांकरिता पोषक असल्याने विविध पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाघ व बिबट मोठ्या  संख्येत आहेत.      मागील पाच वर्षात दोन्ही विभागात जंगलालगतच्या गावांतील  जवळपास २०  नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांवर हल्ले होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाळीव जनावरांचाही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा संघर्ष टाळता यावा, यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने गावागावात पीआरटीची स्थापना केली आहे. 

पीआरटींना दिले जाणार विशेष प्रशिक्षणसंपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

३३ गावात १६५ प्राथमिक बचाव दल३३ गावात प्रत्येकी पाच असे एकूण १६५ पीआरटी स्थापन करण्यात आले आहेत. गावातील नागरिक, गुराखी यांना जंगलात जाण्यापासून थांबविणे, वृक्षतोड थांबविण्यात मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जनजागृतीमुळे मानव - वन्यजीव संघर्ष पीआरटीच्या सहकार्याने टाळता येणार आहे.

मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी वनविभागातर्फे गावकरी व वनविभागामधील दुवा म्हणून प्राथमिक बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळता यावा, जीवितहानी होऊ नये याकरिता केलेला हा एक चांगला प्रयत्न आहे.- पी.एच. ब्राम्हणेवनपरिक्षेत्राधिकारी, उत्तर, ब्रम्हपुरी. 

टॅग्स :forest departmentवनविभाग