शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पीआरटी थांबविणार मानव - वन्यजीव संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

संपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी :  जंगलालगतच्या गावातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाकडून गावागावात पीआरटी (प्राथमिक बचाव दल) स्थापन करण्यात आले आहे.  यामुळे गावातीलच नागरिकांच्या सहकार्याने व जनजागृतीने येत्या काळात मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ब्रम्हपुरी वनविभागाची व्याप्ती फार मोठी आहे. वनविभागाची उत्तर व दक्षिण अशी दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. उत्तर वनविभागाचे क्षेत्र जवळपास १४ हजार हेक्टर तर दक्षिण वनविभागाचे क्षेत्र १६ हजार हेक्टर आहे. येथे साग, अंजन, बेहडा, सालई,  मोहगणी, मोह, तेंदू, चार, धावडा, बिना, खैर, हीवर, सैना, शिवण, बांबू आदी वृक्ष आहेत.  येथील वातावरण वन्य प्राण्यांकरिता पोषक असल्याने विविध पशू, पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वाघ व बिबट मोठ्या  संख्येत आहेत.      मागील पाच वर्षात दोन्ही विभागात जंगलालगतच्या गावांतील  जवळपास २०  नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांवर हल्ले होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक पाळीव जनावरांचाही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हा संघर्ष टाळता यावा, यासाठी ब्रम्हपुरी वनविभागाने गावागावात पीआरटीची स्थापना केली आहे. 

पीआरटींना दिले जाणार विशेष प्रशिक्षणसंपूर्ण वनविभागातील एकूण १६५ पीआरटींना वनविभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा ओळखणे, कोणत्या कक्षात वन्यप्राण्यांचा वावर आहे, याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. सोबतच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. धोका असलेल्या जंगलात जाण्यापासून गावातीलच नागरिक गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्ष निश्चितच टाळता येणार आहे

३३ गावात १६५ प्राथमिक बचाव दल३३ गावात प्रत्येकी पाच असे एकूण १६५ पीआरटी स्थापन करण्यात आले आहेत. गावातील नागरिक, गुराखी यांना जंगलात जाण्यापासून थांबविणे, वृक्षतोड थांबविण्यात मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जनजागृतीमुळे मानव - वन्यजीव संघर्ष पीआरटीच्या सहकार्याने टाळता येणार आहे.

मानव - वन्यजीव संघर्ष रोखण्याच्या उद्देशाने ब्रम्हपुरी वनविभागातर्फे गावकरी व वनविभागामधील दुवा म्हणून प्राथमिक बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळता यावा, जीवितहानी होऊ नये याकरिता केलेला हा एक चांगला प्रयत्न आहे.- पी.एच. ब्राम्हणेवनपरिक्षेत्राधिकारी, उत्तर, ब्रम्हपुरी. 

टॅग्स :forest departmentवनविभाग