शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तरतूद पाच लाखांची, मंजूर होतात ९० हजार

By admin | Updated: November 10, 2015 01:41 IST

राज्यात सर्वाधिक संख्येत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ....

ओबीसी विद्यार्थ्यांची प्रतारणा : अन्यायाची मालिका सुरूचचंद्रपूर : राज्यात सर्वाधिक संख्येत असलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणून ओबीसी विकास महामंडळातर्फे शैक्षणिक कर्ज दिल्या जाते. यासाठी चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी पाच लाखापर्यंतची तरतूद राज्य शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना केवळ ९० हजार ते दीड लाखापर्यंत कर्ज मंजूर होत असल्याने ओबीसी विद्यार्थ्यांची राज्य सरकारकडून अवहेलना होत आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली अन्यायाची ही मालिका भाजपा प्रणित सरकारनेही नित्यनेमाने सुरूच ठेवल्याने ओबीसी विद्यार्थ्यांचा वाली कोण? असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जात आहे. शिष्यवृत्ती योजना, विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क माफी यासारख्या अनेक योजना राबविल्या जातात. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असलेल्या ओबीसी विकास महामंडळाद्वारे शैक्षणिक कर्ज योजना राबविली जात आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, तांत्रिक व अन्य शिक्षणासाठी चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष एक लाख २५ हजार याप्रमाणे पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ओबीसी महामंडळाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी छापील पत्रकावरही ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत असल्याचे भासविण्यात आले. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी ओबीसी महामंडळाकडे प्रस्ताव सादर करतात. परंतु ओबीसी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना तरतुदीपेक्षाही कमी कर्ज मंजूर होत आहे. ९० ते दीड लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मंजूर होत असल्याने ऐनवेळी विद्यार्थी अडचणीत येत आहेत. विशेष म्हणजे अनेक शाळांचे प्रती वर्षाचे शुल्क ५० हजार ते लाखांच्या घरात असताना त्याच्या निम्मेही शैक्षणिक कर्ज उपलब्ध होत नसल्याने मागास प्रवर्गातील ओबीसी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांना असलेल्या शैक्षणिक सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. कुठेही स्वतंत्र वसतिगृहाची सोय नाही, उपलब्ध असलेल्या अन्य वसतिगृहात ओबीसींचा कोटा अत्यल्प आहे. त्यामुळे पावलोपावली ओबीसी विद्यार्थ्यांची अवहेलना करण्याचेच काम राज्य सरकार करीत आहे. (शहर प्रतिनिधी)