शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ब्रह्मपुरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याचा लाभ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:11 IST

विजय वडेट्टीवार यांची मागणी : सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी संबंधितांकडे तक्रार नोंदवली. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे विमा कंपन्यांकडून अद्याप हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या पीक विम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सावली तालुक्यातून २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विमा कंपनीकडून पाहणीअंती ७ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात ४० हजार २६४ विमाधारक शेतकऱ्यांपैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्तांनी तक्रार नोंद केली. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या २० हजार २६३ एवढी आहे. यापैकी हजारो शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळालेला नाही. सणासुदीचे दिवस आहे. बँकेचे व हात उसने कर्ज व सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी प्रचंड संकटात आहे. अन्नदात्याला दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. बियाणे, खते व इतर साहित्याचे वाढलेले प्रचंड भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

केवळ खोट्या आश्वासनांची खैरातसत्ता प्राप्तीसाठी सरकारने केवळ खोट्या आश्वासनांची खैरात वाटली. योजनांचा डंका वाजवला. सरकार तुपाशी व शेतकरी उपाशी अशी स्थिती आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा सरसकट लाभ मिळाला नाही. या संपूर्ण प्रकाराला राज्यातील महायुती सरकार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हलगर्जी धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर