शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याचा लाभ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:11 IST

विजय वडेट्टीवार यांची मागणी : सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी संबंधितांकडे तक्रार नोंदवली. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे विमा कंपन्यांकडून अद्याप हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या पीक विम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सावली तालुक्यातून २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विमा कंपनीकडून पाहणीअंती ७ हजार ५०० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ब्रह्मपुरी तालुक्यात ४० हजार २६४ विमाधारक शेतकऱ्यांपैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्तांनी तक्रार नोंद केली. सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या २० हजार २६३ एवढी आहे. यापैकी हजारो शेतकऱ्यांना पीक विमा लाभ मिळालेला नाही. सणासुदीचे दिवस आहे. बँकेचे व हात उसने कर्ज व सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची दैनावस्था झाली. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी प्रचंड संकटात आहे. अन्नदात्याला दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागत आहे. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाने शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. बियाणे, खते व इतर साहित्याचे वाढलेले प्रचंड भाव यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

केवळ खोट्या आश्वासनांची खैरातसत्ता प्राप्तीसाठी सरकारने केवळ खोट्या आश्वासनांची खैरात वाटली. योजनांचा डंका वाजवला. सरकार तुपाशी व शेतकरी उपाशी अशी स्थिती आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा सरसकट लाभ मिळाला नाही. या संपूर्ण प्रकाराला राज्यातील महायुती सरकार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे हलगर्जी धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर