शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

युवा अधिकाऱ्यांमुळे विकासाला मिळणार चालना

By admin | Updated: January 17, 2017 00:35 IST

तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते.

मूल तालुका : एसडीओंपासून मुख्याधिकाऱ्यांपर्यंत युवा अधिकारी मूल : तालुक्यातील गाव विकास तसेच शहर विकास हा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर अवलंबून असते. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल तालुक्याला युवा अधिकाऱ्यांची ब्रिगेट लाभली आहे. स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन विविध पदावर विराजमान होत विकासाचा ध्यास घेतलेल्या अधिकाऱ्यांकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविकच आहे. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार राजेश सखदे, संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरवढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे अधिकारी स्पर्धा परीक्षेतून आल्याने सामाजिक, शैक्षणिक व गाव विकासाचा ध्यास असणे स्वाभाविकच आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्याला अधिकाऱ्यांची युग ब्रिगेट लाभली आहे. शहर व गाव विकास साधताना या अधिकाऱ्यांची साथ घेतल्या गेली तर शहर व गाव विकासाला फार मोठे योगदान लाभण्याची शक्यता आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी माहिती व्हावी यासाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ते तत्पर असतात. आपण ज्या प्रमाणे प्रयत्न केला, त्याचप्रमाणे गावातील युवक घडावीत. संस्कारी युवापिढी देशासाठी भविष्यकाळ असल्याने त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबरोबरच काम करण्याची जिद्द व आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास युवकांना प्रेरणादायी ठरु शकते. शहर व गाव विकास म्हणजे केवळ नाली व रस्ते बांधणे नव्हे तर प्रत्येकांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार निर्मिती हेही महत्वाचे काम आहे. मूल शहराबरोबरच तालुक्यातील गावात शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यात पाहिजे त्या प्रमाणात स्पर्धा नाही. सामाजिक जाणिवेचा अभाव पदोपदी जाणवतो. यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शहर व गाव विकासाठी कुठलेही राजकारण न आणता अधिकाऱ्यांना सोबत घेतले तर तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सखदे, महसूल विभागाबाबत तत्पर आहेत.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे हे कायद्यात तर संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबळे व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे गाव व शहर विकासासाठी अग्रक्रमी आहेत. संवर्ग विकास अधिकारी पांढरवळे आजही आपले काम सांभाळून रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करीत आहेत. त्यात इतरांची भर पडली तर आपल्या भागातील विद्यार्थी सुसंस्कारीत व सक्षम होण्यासाठी मोलाचा हातभार लाभेल. (तालुका प्रतिनिधी)रोजगार निर्मितीसाठी हातभार लागेलमूल तालुका रोजगार व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याने रोजगारांच्या संधी व शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यास अधिकाऱ्यांची साथ मिळाल्यास मूल शहराबरोबर तालुका देखील रोजगार मुक्त व शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाईल. अधिकाऱ्यांची साथ घ्यायला सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीनी राजकारण न आणता आपल्या गावातील शहरातील युवापिढी सक्षम होण्यास पुढाकार घेतल्यास फायद्याचे ठरेल.