शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

हरवलेला ऐवज परत करण्याचा कार्यक्रम विश्वास वाढविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:06 IST

आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर कार्यक्रमात परत केला, याचा आपल्याला आनंद आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ७३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांच्या सुपुर्द

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर कार्यक्रमात परत केला, याचा आपल्याला आनंद आहे. हरवलेल्या ऐवज परत करण्याच्या अशा कार्यक्रमांमधून पोलिसांप्रति जनतेचा विश्वास वाढतो व पारदर्शी कार्यक्रमाला जनतेकडून प्रतिसाद मिळतो, असे कौतुकाचे उदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले.सामान्य नागरिकांचे चोरी गेलेले आभूषण, पैसे, मोटारसायकली, मोबाईल फोन व अन्य बहुमूल्य वस्तू पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सन्मानपूर्वक सोहळ्यात परत करतात, असा स्वप्नवत वाटणारा व बदल दर्शविणारा सोहळा आज चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित या सोहळ्यामध्ये ७३ लाख रुपयांच्या वस्तू नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्यात. गेल्या दोन महिन्यात चोरी गेलेल्या वस्तूंपैकी ३२ टक्के वस्तू मुद्देमालासह परत करण्याचा विक्रम चंद्रपूर पोलिसांनी केला असून त्याचा अभिनव सोहळा आज पोलीस मैदानावर पार पडला.चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. यावेळी आमदार नाना श्यामकुळे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाण्याचे ठाणेदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी उल्लेखनीय उपस्थिती होती ते गेल्या काही महिन्यात ज्याच्या वस्तू हरवल्या आहेत, अशा सामान्य नागरिकांची. ७३ लाख ८५३ रुपयांचा मुद्देमाल यावेळी जनतेला परत करण्यात आला.पालकमंत्र्यांची सायकलही चोरी गेली होतीआपल्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी तीस वर्षांपूर्वी स्वत:ची हरवलेली सायकल व त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे केलेल्या पाठपुराव्याचा किस्सा सांगितला. आपली सायकल हरवल्यामुळे किमान आठ दिवस तरी पोलीस स्टेशनला सतत फेऱ्या माराव्या लागल्या. माझे नियमित पाठपुरावा करणे आणि त्या सायकलची माझ्यासाठीची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर सततच्या तगाद्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाºयाने मला चहा पाजून माझी चोरी गेली सायकल परत केली, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार