शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

दोन एकरात वांग्याचे तीन लाखांचे उत्पादन

By admin | Updated: November 24, 2014 22:54 IST

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कापूस, सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून पालगाव येथील शेतकरी बाळकृष्ण गणपत आंबटकर

उत्पादनात भरारी : पालगाव येथील शेतकऱ्यांने फुलवली आधुनिक शेतीलखमापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कापूस, सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून पालगाव येथील शेतकरी बाळकृष्ण गणपत आंबटकर (५०) यांनी स्वत:च्या मालकीच्या दोन एकर शेतीत ठिंबक सिंचन व मल्वींग पद्धतीचा वापर केला आहे. याआधारे जमिनीत वांग्याचे पीक लावले असून यात आतापर्यंत त्यांनी तीन लाखांचा निव्वळ नफा कमविला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वडीलोपार्जीत परंपरागत शेती पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याने गेल्या पाच वर्षापासून टरबूज, कांदा, काकडी यासारख्या फळ पिकाचे उत्पादन याआधी घेतले आहे. यावर्षी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व तालुक्यातील शेतकरी मंडळाची मदत घेत त्यांनी वांग्याची शेती केली आहे. यामध्ये साधारणत: दीड लाखापर्यंत लागवड खर्च आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नांदाफाटा, आवारपूर, बिबी या औद्योगिक वस्तीमुळे मालाची वाहतूक सोपी जात आहे. तर चंद्रपूर येथील भाजीपाला बाजारात वांग्याची विक्री शेतकरी करीत आहे. सर्वे-६२ मौजा पालगाव येथील शेतीच्या सिंचनासाठी अर्ध्या किलोमीटवरुन पाईपद्वारे पाणी आणून ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अर्ध्या तासात पाणीपुरवठा करणे सोपे जात आहे. शेतकऱ्याला सुरुवातीला ७५० रुपयाचे बियाणे १२०० रुपयाचे मजूर, ६० ते ७० हजार रुपयाची किटकनाशक फवारणी, ३० हजार रुपयांपर्यंत काढणी खर्च तर १५ हजार रुपये चार दिवसाआड वाग्यांची तोडणी करीता लागत आहे. मात्र, दिवसेंदिवस मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होत असल्याने वांग्याबरोबरच टोमॅटोची शेतीही आधुनिक पद्धतीने त्यांनी केली आहे. (वार्ताहर)