शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

उत्पादन खर्च वाढतोय हजारात, हमीभाव वाढतो रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

संदीप झाडे कूचना : केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला मागील वर्षापेक्षा प्रतिकिलो ४० पैसे वाढ म्हणजे ...

संदीप झाडे

कूचना : केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला मागील वर्षापेक्षा प्रतिकिलो ४० पैसे वाढ म्हणजे प्रतिक्विंटल ४० रुपये वाढ झाली असून, यावर्षी गव्हाचा भाव २,०१५ रुपये, तर हरभरा पिकाला प्रतिकिलो १.४० रुपये यानुसार प्रतिक्विंटल १४० रुपयांची वाढ झाली असून, आता ५,२३० रुपये हमीभाव असणार आहे.

दरवर्षी बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमती वाढत आहेत. त्याचबरोबर मजुरीही वाढत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. अशातच केंद्र सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव जाहीर केला. ज्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्प प्रमाणात भाववाढ देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीभावात मात्र ४० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होत आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत, पेरणी, काढणी, नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने त्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर पडतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. हा खर्च हजाराच्या घरात मात्र पदरी पडते रुपयांच्या दरात. त्यामुळेच शेतीचा व्यवसाय नुकसानाचा होत असल्याचे म्हटले जात आहे. घरगुती वापरातील सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत, मात्र शेतमालाचे भाव हे अत्यल्प दराने वाढत आहेत.

कोट

सरकारने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी, पेट्रोल शंभरच्या पुढे, मात्र हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, हीच केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका दिसत आहे.

- प्रकाश निब्रड, शेतकरी, रा. पळसगाव, ता. भद्रावती

कोट

शेतकरी राबराब राबतो. तरीही शेतकऱ्यांचा जर उत्पादन खर्च निघत नसेल, त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळत नसेल तर हा हमीभाव काय कामाचा?

- कपिल रांगणकर, शेतकरी, राळेगाव, ता. भद्रावती