शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही जिल्ह्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:21 IST

चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून सिंदेवाही नव्या जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी नायब तहसीलदारामार्फत सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देसर्व सुविधांनी युक्त : जिल्हा निर्मिती कृती समितीची मागणी

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून सिंदेवाही नव्या जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी नायब तहसीलदारामार्फत सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने एका निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.सिंदेवाही हे शहर चंद्रपूर-नागपूर व चिमूर-गडचिरोली महामार्गावर असून मध्यवर्ती केंद्र आहे. सिंदेवाही, सावली, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर हे सहा तालुके मिळून सिंदेवाही जिल्हा निर्माण करण्याकरिता भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. सहा तालुक्यातील प्रशासकीय कामाकरिता नागरिकांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ब्रॉडगेज रेल्वे स्टेशन उपलब्ध आहे. मध्यवर्ती सुसज्ज बसस्थानक असून सहा तालुक्याशी जोडणाºया बसची सुविधाही उपलब्ध आहे. शहराच्या पूर्वेस सावली, पश्चिमेस चिमूर, उत्तरेस नागभीड, दक्षिणेस मूल व इशान्य व उत्तर दिशेला ब्रह्मपुरी तालुका आहे. येथून चिमूर ४० किमी, नागभीड ३८ किमी, ब्रह्मपुरी ४७ किमी, मूल २५ किमी, सावली ३० किमी अंतरावर आहे. त्यामुळे सिंदेवाही मुख्यालयात येण्याकरिता एस. टी. ला एक ते दीड तास आणि रेल्वेला एक तास लागतो. सिंदेवाही शहराची विदर्भात ओळख आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील ग्रामसेवक सिंदेवाही येथे प्रशिक्षणासाठी येतात. ब्रॉडगेज रेल्वेस्टेशन असल्यामुळे गोंदिया ते बल्लारपूर रेल्वे दररोज ये-जा करते. सिंदेवाहीला जिल्हा करावा, ही जुनी मागणी आहे. यापूर्वी कपूर समितीला निवेदन सादर केले होते. विभाजनानंतर सर्व दृष्टीने मध्यवर्ती केंद्र, जागेची उपलब्धता, दळणवळणाच्या सोयी, आर्थिक व प्रशासकीयदृष्ट्या सर्व सामान्यांना परवडणारे सिंदेवाही हे स्थळ आहे. त्यामुळे राजकीय दबावतंत्राला बळी न पडता सिंदेवाहीचा नवनिर्मित जिल्ह्याच्या यादीत समावेश करावा, असे निवेदन सिंदेवाही जिल्हा निर्मिती कृती समितीने दिले आहे. निवेदन देताना जिल्हा कृती समितीचे संयोजक मनोहर पवार, प्रा. देवराव बोरकर, संजय खोब्रागडे, सुरेश सोनवाने, किशोर मेश्राम, अरुणा चंद्रगिरीवार, रामदास निकूरे, मनोहर दाऊवार व कार्यकर्ते उपस्थित होते.