शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

लेखा आक्षेपांवर कार्यवाही शून्य

By admin | Updated: February 24, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते.

लेखा विभाग पांगळा : लेखा परीक्षण ठरतेय कुचकामीचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते. जिल्हा निधी, शासकीय अनुदान खर्चासाठी दरवर्षी लेखा परीक्षण केले जाते. या लेखा परीक्षणाच्या वेळी अनेकजण लेखा आक्षेप नोंदवितात. मात्र आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करण्यात लेखा विभाग अपयशी ठरला असून जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमार्फत गेल्या १५ वर्षात १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी तिनस्तरीय विभागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, पंचायत, रोजगार हमी, सिंचाई, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समित्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी दिला जातो. मात्र दिलेल्या निधीचे योग्य उपयोग झाला किंवा नाही यासाठी लेखा परीक्षण केले जाते. ज्यावेळी लेखा परीक्षण होते, त्यावेळी सर्वच पंचायत समित्यांवर लेखा आक्षेप नोंदविले जातात. या लेखा आक्षेपांची पुर्तता करणे लेखा विभागाला गरजेचे असते. मात्र या आक्षेपांची अद्यापही पुर्तता न झाल्याने १५ पंचायत समित्यांमध्ये सन २०००-०१ पासून १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित आहेत. जिल्हा निधी व शासकीय अनुदान खर्चाचे लेखा परीक्षण स्थानिक लेखा निधी, महालेखाकार यांच्या मार्फत दरवर्षी होत असते. मात्र आलेल्या लेखा आक्षेपांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महालेखाकार दर चार वर्षांनी लेखा परिक्षण करीत असते. मात्र त्यांच्या परिक्षणानंतरही आक्षेपांवर कार्यवाही होत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालावरून दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)