शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

लेखा आक्षेपांवर कार्यवाही शून्य

By admin | Updated: February 24, 2016 00:45 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते.

लेखा विभाग पांगळा : लेखा परीक्षण ठरतेय कुचकामीचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते. जिल्हा निधी, शासकीय अनुदान खर्चासाठी दरवर्षी लेखा परीक्षण केले जाते. या लेखा परीक्षणाच्या वेळी अनेकजण लेखा आक्षेप नोंदवितात. मात्र आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करण्यात लेखा विभाग अपयशी ठरला असून जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमार्फत गेल्या १५ वर्षात १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी तिनस्तरीय विभागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, पंचायत, रोजगार हमी, सिंचाई, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समित्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी दिला जातो. मात्र दिलेल्या निधीचे योग्य उपयोग झाला किंवा नाही यासाठी लेखा परीक्षण केले जाते. ज्यावेळी लेखा परीक्षण होते, त्यावेळी सर्वच पंचायत समित्यांवर लेखा आक्षेप नोंदविले जातात. या लेखा आक्षेपांची पुर्तता करणे लेखा विभागाला गरजेचे असते. मात्र या आक्षेपांची अद्यापही पुर्तता न झाल्याने १५ पंचायत समित्यांमध्ये सन २०००-०१ पासून १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित आहेत. जिल्हा निधी व शासकीय अनुदान खर्चाचे लेखा परीक्षण स्थानिक लेखा निधी, महालेखाकार यांच्या मार्फत दरवर्षी होत असते. मात्र आलेल्या लेखा आक्षेपांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महालेखाकार दर चार वर्षांनी लेखा परिक्षण करीत असते. मात्र त्यांच्या परिक्षणानंतरही आक्षेपांवर कार्यवाही होत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालावरून दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)