शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

संकटांवर मात करून प्रियंका झाली सुवर्णकन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:07 IST

इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला.

ठळक मुद्देविद्यापीठात अव्वल : शहरातील शैक्षणिक वर्तुळात आनंद

अनेकश्वर मेश्राम।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीने गुणवत्ता गाठली. प्रियंका पंतुल भुक्या ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात अव्वल आली. शनिवारी विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रियंकाला तब्बल सहा सुवर्णपदक मिळाल्याने शहरातील शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. यामुळे बल्लारपूर येथील प्रियंका पंतुल भुक्या सुवर्ण कन्या ठरली.स्थानिक शिवनगर वॉर्डात पंतुल भुक्या यांचे कुटुंब राहते. पत्नी चंद्रावती, दोन मुली वृक्षता व प्रियंका, मुलगा शशीकुमार असे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. प्रियंकाच्या वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने सतत अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक मिळकत अल्प असतानाही प्रियंकाला शिक्षणात कमी पडू दिले नाही. मोठी बहिण वृक्षता हिनेही तिच्या शिक्षणात बराच हातभार लावला. बिकट परिस्थितीवर मात करुन प्रियंकाने यशाला गवसणी घातली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१७ च्या परीक्षेत एमएस्सी चवथ्या सत्राच्या रसायनशास्त्र विषयात यश संपादन करुन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. प्रियंकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट येथे झाले. त्यानंतर येथील गुरूनानक विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सीची पदवी घेतली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथूनही दुसरी आली होती. त्यानंतर एमएस्सी पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधून पूर्ण केले. विशेष म्हणजे राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एमएस्सी रसायनशास्त्र विषयाची गुणवत्ता यादी जाहीर केली असून यामध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नऊ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या आहेत. प्रियंका भुक्या हिला २५०० गुणांपैकी २०३३ गुण मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. यामध्ये यश मिळावयचे असेल तर अभ्यासाचे सातत्य आणि अवांतर विषयाचे वाचन या आदी कौशल्याची गरज आहे, असे मत प्रियंकाने ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहे.संशोधन पूर्ण करणारवेळेचे महत्त्व ओळखून अभ्यासाचे नियोजन केले. शिवाय, सकारात्मक विचार मनात कायम ठेवल्याने उच्च शिक्षणात चांगले यश मिळविणे शक्य झाले. बारावीनंतर एमबीबीएसला जावून डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र, ती संधी हुकली. त्यामुळे मन खचले होते. अपयशाला पचवूनच ध्येय गाठावे लागते. काळोखातच उद्याचा प्रकार दडला असतो. रसायनशास्त्र विषयात संशोधन करुन पीएचडी मिळविणार आहे, अशी माहिती प्रियंकाने ‘लोकमत‘ शी बोलताना दिली.