शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

संकटांवर मात करून प्रियंका झाली सुवर्णकन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:07 IST

इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला.

ठळक मुद्देविद्यापीठात अव्वल : शहरातील शैक्षणिक वर्तुळात आनंद

अनेकश्वर मेश्राम।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : इच्छाशक्तीला प्रयत्नाचे बळ मिळाले. अवघ्या काही गुणांनी एमबीबीएसची संधी चुकली. पण, ती निराश झाली नाही. जेमतेम परिस्थिती असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास घेतला. आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीने गुणवत्ता गाठली. प्रियंका पंतुल भुक्या ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात अव्वल आली. शनिवारी विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रियंकाला तब्बल सहा सुवर्णपदक मिळाल्याने शहरातील शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. यामुळे बल्लारपूर येथील प्रियंका पंतुल भुक्या सुवर्ण कन्या ठरली.स्थानिक शिवनगर वॉर्डात पंतुल भुक्या यांचे कुटुंब राहते. पत्नी चंद्रावती, दोन मुली वृक्षता व प्रियंका, मुलगा शशीकुमार असे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण आहे. प्रियंकाच्या वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने सतत अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक मिळकत अल्प असतानाही प्रियंकाला शिक्षणात कमी पडू दिले नाही. मोठी बहिण वृक्षता हिनेही तिच्या शिक्षणात बराच हातभार लावला. बिकट परिस्थितीवर मात करुन प्रियंकाने यशाला गवसणी घातली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या २०१७ च्या परीक्षेत एमएस्सी चवथ्या सत्राच्या रसायनशास्त्र विषयात यश संपादन करुन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. प्रियंकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट येथे झाले. त्यानंतर येथील गुरूनानक विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सीची पदवी घेतली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथूनही दुसरी आली होती. त्यानंतर एमएस्सी पदव्युत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधून पूर्ण केले. विशेष म्हणजे राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एमएस्सी रसायनशास्त्र विषयाची गुणवत्ता यादी जाहीर केली असून यामध्ये ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नऊ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या आहेत. प्रियंका भुक्या हिला २५०० गुणांपैकी २०३३ गुण मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. यामध्ये यश मिळावयचे असेल तर अभ्यासाचे सातत्य आणि अवांतर विषयाचे वाचन या आदी कौशल्याची गरज आहे, असे मत प्रियंकाने ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहे.संशोधन पूर्ण करणारवेळेचे महत्त्व ओळखून अभ्यासाचे नियोजन केले. शिवाय, सकारात्मक विचार मनात कायम ठेवल्याने उच्च शिक्षणात चांगले यश मिळविणे शक्य झाले. बारावीनंतर एमबीबीएसला जावून डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र, ती संधी हुकली. त्यामुळे मन खचले होते. अपयशाला पचवूनच ध्येय गाठावे लागते. काळोखातच उद्याचा प्रकार दडला असतो. रसायनशास्त्र विषयात संशोधन करुन पीएचडी मिळविणार आहे, अशी माहिती प्रियंकाने ‘लोकमत‘ शी बोलताना दिली.