शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी सिंचनाला प्राधान्य

By admin | Updated: March 20, 2017 00:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

हंसराज अहीर : कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पणचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने इंडियन फार्मर्स फर्र्टिलायझर को-आॅपरेटीव्ह लिमिटेड (इफको) ने नागरी येथे बंधारा बांधकाम करून या धोरणाला पुरक असे कार्य केले आहे. यामुळे या भागातील अवर्षण परिस्थिती संपून शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समद्धीसाठी सतत प्रयत्नशील असून अशी विकास कामे आमच्या प्रयत्नांची यशस्विता स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा तालुक्यातील नागरी येथे इफको इफको पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पण शनिवारला करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी पालकमंत्री संजय देवतळे, इफकोचे विपनन निर्देेशक अरविंदो रॉय, इफकोचे डॉ. वानखेडे, गाडगे, लोंढे, वरोरा पं.स. च्या नवनियुक्त सभापती रोहीणी देवतळे, उपसभापती विजय आत्राम, सरपंच बेबी पिसे, उपसरपंच चंद्रशेखर नौकरकार, भाजपा नेते शेखर चौधरी, रवींद्र कष्टी, बापु धात्रक आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभुत किंमत मिळवून देण्यासाठी केंद्रीय संस्था सीसीआय व नाबार्डला खरेदी करण्यास बाध्य केल्याचे सांगताना शेतकऱ्यांचा माल कमी भावा विकू देणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. याप्रसंगी बोलताना माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी सातेफळ, नागरी व लाडकी येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी इफकोच्या मार्फत बंधारा बांधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त केले.याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते नागरी येथे पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इफकोच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे निदेशक वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगे यांनी तर उपस्थिताचे आभार डॉ. भगवान गायकवाड यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)