शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

३१ मार्चपूर्वी निधी खर्चासाठी ग्रामपंचायतींची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन विकासकामे पूर्ण करण्याची लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा निधी अखर्चित : १४ व्या वित्त आयोगाची मुदत मार्चमध्ये संपणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतींना मिळाल्याने सरपंच व ग्रामसभांच्या आर्थिक निर्णयाला मोठे महत्त्व आले. परंतु, विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन विकासकामे पूर्ण करण्याची लगबग सुरू केली आहे.पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने २०१३ रोजी डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील १४ व्या वित्त आयोगाची निर्मिती केली. या आयोगाने केलेल्या बहुतांश शिफारसी केंद्र सरकारला स्वीकारल्या आहेत. ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५ ते २०१९ या वर्षांत कोट्यवधींचा निधी मंजूर केला. पंचायत विभागातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ३५ टक्के निधी अर्खित आहेत. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, नालीबांधकाम आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी हा निधी वापरण्याचे निर्देश राज्याच्या पंचायत विभागाने दिल्या होत्या. आयोगाच्या निधीतून करावयाच्या विकास कामांचा आराखडा ग्रामपंचायत व ग्रामसभेत तयार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या.पाणीपुरवठा योजनांना प्राधान्ययंदा जिल्ह्यात मूबलक पाऊस पडल्याने सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत समाधानकारक आहेत. मात्र, १०० ग्रा. पं. मध्ये वाढीव पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याने विशेषत: योजनेवर खर्चाची तयारी सुरू आहे.निधी खर्चासाठी ग्रामसेवकांचे प्रशिक्षण१४ व्या वित्त आयोगाचा निधी विहित कालावधीत आराखड्यानुसारच पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामसेवकांना जि. प. कडून मार्गदर्शन करण्यात आले. यापूर्र्वी काही ग्रामपंचायतींनी आराखड्यातील त्रुटी दूर करण्यातच वेळ घालविला तर काहींनी हलगर्जीपणामुळे निधी खर्च केला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे जि. प. उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी (पंचायत) बैठका घेऊन व स्मरणपत्रे पाठवून ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शिल्लक निधी खर्चासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.१४ वा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने विकासाला चालना मिळाली. ज्या ग्रामपंचायतींचा निधी शिल्लक आहे. त्यांना विहित काळातच विकासासाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.- राजु गायकवाड, सभापती अर्थ व बांधकाम जि. प. चंद्रपूर 

टॅग्स :zpजिल्हा परिषद