शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

३१ मार्चपूर्वी निधी खर्चासाठी ग्रामपंचायतींची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन विकासकामे पूर्ण करण्याची लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा निधी अखर्चित : १४ व्या वित्त आयोगाची मुदत मार्चमध्ये संपणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतींना मिळाल्याने सरपंच व ग्रामसभांच्या आर्थिक निर्णयाला मोठे महत्त्व आले. परंतु, विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन विकासकामे पूर्ण करण्याची लगबग सुरू केली आहे.पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने २०१३ रोजी डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील १४ व्या वित्त आयोगाची निर्मिती केली. या आयोगाने केलेल्या बहुतांश शिफारसी केंद्र सरकारला स्वीकारल्या आहेत. ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५ ते २०१९ या वर्षांत कोट्यवधींचा निधी मंजूर केला. पंचायत विभागातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ३५ टक्के निधी अर्खित आहेत. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, नालीबांधकाम आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी हा निधी वापरण्याचे निर्देश राज्याच्या पंचायत विभागाने दिल्या होत्या. आयोगाच्या निधीतून करावयाच्या विकास कामांचा आराखडा ग्रामपंचायत व ग्रामसभेत तयार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या.पाणीपुरवठा योजनांना प्राधान्ययंदा जिल्ह्यात मूबलक पाऊस पडल्याने सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत समाधानकारक आहेत. मात्र, १०० ग्रा. पं. मध्ये वाढीव पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याने विशेषत: योजनेवर खर्चाची तयारी सुरू आहे.निधी खर्चासाठी ग्रामसेवकांचे प्रशिक्षण१४ व्या वित्त आयोगाचा निधी विहित कालावधीत आराखड्यानुसारच पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामसेवकांना जि. प. कडून मार्गदर्शन करण्यात आले. यापूर्र्वी काही ग्रामपंचायतींनी आराखड्यातील त्रुटी दूर करण्यातच वेळ घालविला तर काहींनी हलगर्जीपणामुळे निधी खर्च केला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे जि. प. उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी (पंचायत) बैठका घेऊन व स्मरणपत्रे पाठवून ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे शिल्लक निधी खर्चासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.१४ वा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने विकासाला चालना मिळाली. ज्या ग्रामपंचायतींचा निधी शिल्लक आहे. त्यांना विहित काळातच विकासासाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.- राजु गायकवाड, सभापती अर्थ व बांधकाम जि. प. चंद्रपूर 

टॅग्स :zpजिल्हा परिषद