शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:20 IST

राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, .....

ठळक मुद्दे३०० लोकांची वस्ती : पाणी, वीज, रस्ता व घरकुलापासूनही वंचित

आनंद भेंडे।ऑनलाईन लोकमतराजुरा : राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, पाणी, रस्ता, घरकूल, राशन कार्ड व इतर सोई सवलतीपासून वंचित आहेत. पाण्याची सोय नसल्यामुळे आजही त्यांना नाल्यातीलच पाण्यावर तहान भागवावी लाग आहे.शासनाचे अधिकारी व राजकीय नेते निवडणूक आली की विविध आश्वासने देतात. परंतु अद्याप एकानेही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील रामू भिमू कुमरे, भोजी जंगु आत्राम, माकु भित्तु आत्राम यांनी ‘लोकमत’ जवळ संताप व्यक्त केला.ग्रामपंचायत कोष्टाळा व विरूर वन परिक्षेत्राच्या कोष्टाळा कक्ष क्रमांक १२६ मध्ये अतिक्रमण करून शेती व घरे बांधून हे आदिम कोलाम बांधव वास्तव्य करीत आहे. गावापासून दूर व जंगल परिसरात राहून शेती करणे व बांबूपासून ताटवे, टोपले बनवून बाजारात विक्री करणे, त्यापासून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. कोलामांनी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल देण्याची मागणी पंचायत समिती व आमदारांकडे वारंवार निवेदन देऊन केली आहे. मात्र अद्यापही बोअरवेलची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे आजही नाल्यात खड्डा खोदून पाणी पिणे सुरू आहे. तसेच त्यांना विजेअभावी अंधारात जीवन जगावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे शेताच्या पायवाटवरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस पडला तर या मार्गावरून जाणे-येणे बंद होते. त्यामुळे आजारी लोकांना खाटेवर तडफडत राहावे लागते.शासनाच्या वार्षिक बजेटच्या ९ टक्के रक्कम आदिम आदिवासींच्या विकासासाठी सुरक्षित ठेवली जाते. आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत ही रक्कम खर्च केली जाते. परंतु कोलाम बांधव आजही विकासापासून कोसोदूर आहेत.पंचायत समिती राजुराद्वारा बगलवाही येथील कोलाम वस्तीत पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरवेल मंजूर करण्यात आली. परंतु वन विभागाच्या आडकाठीमुळे बोअरवेल खोदण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांना अवगत करण्यात आले आहे. वन्यप्राणी व कार्यरत वन कर्मचाºयांसाठी वनात बोअरवेल खोदली जाते, मग कोलाम बांधवांसाठी का खोदू दिली जात नाही, यावर वन व राजस्व विभागात चर्चा सुरू आहे.- ओमप्रकाश रामावत,संवर्ग विकास अधिकारी,पंचायत समिती, राजुरा