शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:20 IST

राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, .....

ठळक मुद्दे३०० लोकांची वस्ती : पाणी, वीज, रस्ता व घरकुलापासूनही वंचित

आनंद भेंडे।ऑनलाईन लोकमतराजुरा : राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, पाणी, रस्ता, घरकूल, राशन कार्ड व इतर सोई सवलतीपासून वंचित आहेत. पाण्याची सोय नसल्यामुळे आजही त्यांना नाल्यातीलच पाण्यावर तहान भागवावी लाग आहे.शासनाचे अधिकारी व राजकीय नेते निवडणूक आली की विविध आश्वासने देतात. परंतु अद्याप एकानेही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील रामू भिमू कुमरे, भोजी जंगु आत्राम, माकु भित्तु आत्राम यांनी ‘लोकमत’ जवळ संताप व्यक्त केला.ग्रामपंचायत कोष्टाळा व विरूर वन परिक्षेत्राच्या कोष्टाळा कक्ष क्रमांक १२६ मध्ये अतिक्रमण करून शेती व घरे बांधून हे आदिम कोलाम बांधव वास्तव्य करीत आहे. गावापासून दूर व जंगल परिसरात राहून शेती करणे व बांबूपासून ताटवे, टोपले बनवून बाजारात विक्री करणे, त्यापासून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. कोलामांनी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल देण्याची मागणी पंचायत समिती व आमदारांकडे वारंवार निवेदन देऊन केली आहे. मात्र अद्यापही बोअरवेलची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे आजही नाल्यात खड्डा खोदून पाणी पिणे सुरू आहे. तसेच त्यांना विजेअभावी अंधारात जीवन जगावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे शेताच्या पायवाटवरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस पडला तर या मार्गावरून जाणे-येणे बंद होते. त्यामुळे आजारी लोकांना खाटेवर तडफडत राहावे लागते.शासनाच्या वार्षिक बजेटच्या ९ टक्के रक्कम आदिम आदिवासींच्या विकासासाठी सुरक्षित ठेवली जाते. आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत ही रक्कम खर्च केली जाते. परंतु कोलाम बांधव आजही विकासापासून कोसोदूर आहेत.पंचायत समिती राजुराद्वारा बगलवाही येथील कोलाम वस्तीत पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरवेल मंजूर करण्यात आली. परंतु वन विभागाच्या आडकाठीमुळे बोअरवेल खोदण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांना अवगत करण्यात आले आहे. वन्यप्राणी व कार्यरत वन कर्मचाºयांसाठी वनात बोअरवेल खोदली जाते, मग कोलाम बांधवांसाठी का खोदू दिली जात नाही, यावर वन व राजस्व विभागात चर्चा सुरू आहे.- ओमप्रकाश रामावत,संवर्ग विकास अधिकारी,पंचायत समिती, राजुरा