शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील पाण्यावर जीवन जगतात आदिम कोलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:20 IST

राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, .....

ठळक मुद्दे३०० लोकांची वस्ती : पाणी, वीज, रस्ता व घरकुलापासूनही वंचित

आनंद भेंडे।ऑनलाईन लोकमतराजुरा : राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामधील बगलवाही व पाटागुडा येथील ३०० आदिम कोलाम सुमारे १०-१५ वर्षांपासून शासनाच्या वीज, पाणी, रस्ता, घरकूल, राशन कार्ड व इतर सोई सवलतीपासून वंचित आहेत. पाण्याची सोय नसल्यामुळे आजही त्यांना नाल्यातीलच पाण्यावर तहान भागवावी लाग आहे.शासनाचे अधिकारी व राजकीय नेते निवडणूक आली की विविध आश्वासने देतात. परंतु अद्याप एकानेही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे या दोन्ही गावातील रामू भिमू कुमरे, भोजी जंगु आत्राम, माकु भित्तु आत्राम यांनी ‘लोकमत’ जवळ संताप व्यक्त केला.ग्रामपंचायत कोष्टाळा व विरूर वन परिक्षेत्राच्या कोष्टाळा कक्ष क्रमांक १२६ मध्ये अतिक्रमण करून शेती व घरे बांधून हे आदिम कोलाम बांधव वास्तव्य करीत आहे. गावापासून दूर व जंगल परिसरात राहून शेती करणे व बांबूपासून ताटवे, टोपले बनवून बाजारात विक्री करणे, त्यापासून मिळालेल्या रकमेतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा त्यांचा दिनक्रम आहे. कोलामांनी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बोअरवेल देण्याची मागणी पंचायत समिती व आमदारांकडे वारंवार निवेदन देऊन केली आहे. मात्र अद्यापही बोअरवेलची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे आजही नाल्यात खड्डा खोदून पाणी पिणे सुरू आहे. तसेच त्यांना विजेअभावी अंधारात जीवन जगावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे शेताच्या पायवाटवरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस पडला तर या मार्गावरून जाणे-येणे बंद होते. त्यामुळे आजारी लोकांना खाटेवर तडफडत राहावे लागते.शासनाच्या वार्षिक बजेटच्या ९ टक्के रक्कम आदिम आदिवासींच्या विकासासाठी सुरक्षित ठेवली जाते. आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत ही रक्कम खर्च केली जाते. परंतु कोलाम बांधव आजही विकासापासून कोसोदूर आहेत.पंचायत समिती राजुराद्वारा बगलवाही येथील कोलाम वस्तीत पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरवेल मंजूर करण्यात आली. परंतु वन विभागाच्या आडकाठीमुळे बोअरवेल खोदण्यात आली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांना अवगत करण्यात आले आहे. वन्यप्राणी व कार्यरत वन कर्मचाºयांसाठी वनात बोअरवेल खोदली जाते, मग कोलाम बांधवांसाठी का खोदू दिली जात नाही, यावर वन व राजस्व विभागात चर्चा सुरू आहे.- ओमप्रकाश रामावत,संवर्ग विकास अधिकारी,पंचायत समिती, राजुरा