शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:18 IST

शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस इत्यादी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन या रथाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे.या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेत कर्जदार शेतकºयांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख २४ जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वरील सर्व पीकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.तर बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांचे कर्ज व विमा हप्ता सी.एस.सी. मार्फत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.सी.एस.सी.ई.गर्व्हनंस सव्हीर्सेस इंडिया लिमिटेडद्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रातर्फे या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यास मदत करणार आहेत. तेव्हा शेतकºयांनी विमा काढण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.या चित्ररथाद्वारे जिल्हयात ३१ जुलैपर्यंत विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विम्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.