शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:18 IST

शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस इत्यादी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन या रथाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे.या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेत कर्जदार शेतकºयांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख २४ जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वरील सर्व पीकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.तर बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांचे कर्ज व विमा हप्ता सी.एस.सी. मार्फत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.सी.एस.सी.ई.गर्व्हनंस सव्हीर्सेस इंडिया लिमिटेडद्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रातर्फे या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यास मदत करणार आहेत. तेव्हा शेतकºयांनी विमा काढण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.या चित्ररथाद्वारे जिल्हयात ३१ जुलैपर्यंत विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विम्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.