शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:18 IST

शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती मिळावी आणि योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्दी रथाची सुरुवात करण्यात आली आहे. या चित्ररथाव्दारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत भात, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस इत्यादी पिकांचा विमा काढण्याचे आवाहन या रथाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येऊन आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. या सर्व बाबीचा विचार करुन शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली आहे.या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळणार आहे. या योजनेत कर्जदार शेतकºयांनी सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम तारीख २४ जुलै ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वरील सर्व पीकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा.तर बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांचे कर्ज व विमा हप्ता सी.एस.सी. मार्फत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.सी.एस.सी.ई.गर्व्हनंस सव्हीर्सेस इंडिया लिमिटेडद्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रातर्फे या कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यास मदत करणार आहेत. तेव्हा शेतकºयांनी विमा काढण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.या चित्ररथाद्वारे जिल्हयात ३१ जुलैपर्यंत विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री पीक विम्याशी संबंधित माहिती शेतकऱ्यांना देणार आहे. त्यामुळे या योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे. यासाठी त्यांच्याकडून प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.