शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना बासनात

By admin | Updated: November 16, 2015 00:49 IST

केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील गावे मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मोठा गाजावाजा करत अमलात आणली.

केंद्राचा निधी देण्यास नकार: पैसेच नसल्याने कामे अर्धवटचंद्रपूर : केंद्र शासनाने सन २००१ मध्ये ग्रामीण भागातील गावे मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मोठा गाजावाजा करत अमलात आणली. मात्र नोव्हेंबर २०१४ पासून या योजनेत केंद्रशासनाने निधी देण्यास नकार दिल्याने ही योजनाच आता बासनात गुंडाळल्या जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्या पाठोपाठ ५०० ते एक हजार लोकसंख्या असलेली गावे मजबूत रस्त्याने जोडणे असा कार्यक्रम प्रधानमंत्री सडक योजनेत राबविण्यात आला. या उपक्रमाने अनेक अविकसित असलेली गावे ही मुख्य रस्त्याला जोडण्यात आली. यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात निधीही उपलबध करून दिला होता. साधारणपणे या उपक्रमामुळे सन २००५ ते २००६ पर्यंत राज्यातील खेडी जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत टप्पा क्रमांक दोनमध्ये रस्ता सुधारणा करण्याची प्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून राबविली यामध्ये रस्त्याची कामेही समाधानकारक करण्यात आली. सन २०१० मध्ये या योजनेत करण्यात आलेल्या रस्त्यावरील पुलाच्या निर्मितीचे कामे हाती घेण्यात आले. ही योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत व्यवस्थीत सुरू होती. आता केंद्रात सत्ता बदल होताच प्रधानमंत्री ग्राम योजनेला निधी देणेच बंद केले आहे. संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या योजनेतील कामे अर्धवट स्थितीत अडकून पडली आहेत. परिणामी काम करणारी यंत्रणाही संकटात सापडली आहे. केंद्र शासनाने सदर योजनेसाठी निधी देणे बंद केल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आता गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील नोव्हेंबर महिन्यापासून योजनेस केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या व मंजुर कामांना शासनाने निधी द्यावा अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)कामाचा मोबदला मिळेनापंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी निधी देण्यात न आल्याने या योजनेवरच भविष्यात संकट ओढवण्याची भिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने संबंधित कंत्राटदार संतापले आहेत. शासनाने करोडो रुपयांच्या वर्कआर्डर देवून कंत्राटदारांकडून अर्ध्यापेक्षा अधिक काम करून घेतले. आता कामाचे पैसे देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने कंत्राटदारांना नाईलाजाने काम बंद करावे लागत आहे. भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली ही योजना पुन्हा भाजप सरकारच्या काळातच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत रस्त्याच्या कामासाठी केवळ सहा हजार ७८३ कोटी रुपये मंजूर झाले आणि पाच हजार २६६ कोटी रुपये या योजनेतून मिळाले आहेत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून या योजनेला केंद्राकडून निधी नसल्याने ही योजना कोमात गेली आहे.