शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:47 IST

वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देलाभार्थी महिलांची ‘लोकमत’जवळ कैफियत : गॅस भरून देण्यासाठीही मागतात १७०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. कोरपना तालुक्यात एका गॅस एजन्सीने आदिवासी महिलांकडून तब्बल २२०० रुपये घेऊन या योजनेत कनेक्शन दिले. इतकेच नव्हे, तर सिलिंडर संपल्यानंतर गॅस एजन्सीकडून पुन्हा १७०० रुपये मागितले जात आहेत. मग ही योजना कशासाठी, अशी कैफियत कोरपना तालुक्यातील रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून मांडली.गडचांदूर येथील मिताशा इंडेन गॅस एजंसीचे प्रतिनिधी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची यादी घेऊन गावात आले होते. त्या यादीत नावे असणाऱ्यांनी २२०० रुपये जमा करा आणि योजनेतून गॅस कनेक्शन घ्या, असे सांगितले. उसणवारी घेऊन रक्कम जमा केली व गॅस कनेक्शन घेतले. रकमेची पावती दिली नाही. असाच प्रकार इतरही गावात घडला. गॅस कनेक्शनचे कार्ड दिले.पण त्यावर ग्राहक क्रमांकच नाही. महिना दोन महिन्यांनी सिलिंडर संपले असता सदर गॅस एजन्सीना कळविले. मात्र पुन्हा १७०० रुपये जमा करावे लागणार असे सांगितले. योजनेच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडचांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना ही बाब सांगितली. त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली असता एसडीओंना गॅस एजन्सीवर कारवाईचे आदेशही दिले. मात्र समस्या सुटली नाही, अशी व्यथाही यावेळी रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सांगितली.कोरपना तालुक्यातील रायपूर, शिवापूर, गोविंदपूर, कोथोड(बु.) व कोथोड (खुर्द) ही सर्व गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत. या गावातील महिलांकडून मिताश गॅस एजन्सीने प्रत्येकी २२०० रुपये घेऊन पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. आता सिलिंडर संपले. ते भरून देण्यासाठी पुन्हा १७०० रुपये मागत आहे. याबाबत एजंसी मालकाशी संपर्क केला तर फोन लागत नाही. येत्या ९ एप्रिलपर्यंत या महिलांना सिलिंडर भरून मिळाले नाही, तर सिलिंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.- अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, अध्यक्ष, श्रमिक एल्गार.लाभार्थ्यांच्या नावांची यादी एजंसीने गावात पाठविली. गॅस सोडविण्यासाठी २२०० रुपये मागितले. उसणवारी करून रक्कम जमा केली. याची पावतीही दिली नाही. त्यांनी कनेक्शन आॅनलाईनसुद्धा करून दिले नाही. गॅस संपल्यानंतर ते भरून द्या म्हटले, तर पुन्हा १७०० रुपये मागितले. यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.- कल्पना प्रकाश आत्राम, लाभार्थी, रायपूर. ता. कोरपना.याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. तक्रारीवरून शहानिशा करण्यासाठी आम्ही पुरवठा विभागाला माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार आहे.- विनोद रोकडे, ठाणेदार, गडचांदूर