शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले २२०० रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:47 IST

वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली.

ठळक मुद्देलाभार्थी महिलांची ‘लोकमत’जवळ कैफियत : गॅस भरून देण्यासाठीही मागतात १७०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वृक्षतोड थांबावी. घराघरात चुलीऐवजी गॅस सिलिंडरचा वापर करून स्वयंपाक व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. कोरपना तालुक्यात एका गॅस एजन्सीने आदिवासी महिलांकडून तब्बल २२०० रुपये घेऊन या योजनेत कनेक्शन दिले. इतकेच नव्हे, तर सिलिंडर संपल्यानंतर गॅस एजन्सीकडून पुन्हा १७०० रुपये मागितले जात आहेत. मग ही योजना कशासाठी, अशी कैफियत कोरपना तालुक्यातील रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून मांडली.गडचांदूर येथील मिताशा इंडेन गॅस एजंसीचे प्रतिनिधी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची यादी घेऊन गावात आले होते. त्या यादीत नावे असणाऱ्यांनी २२०० रुपये जमा करा आणि योजनेतून गॅस कनेक्शन घ्या, असे सांगितले. उसणवारी घेऊन रक्कम जमा केली व गॅस कनेक्शन घेतले. रकमेची पावती दिली नाही. असाच प्रकार इतरही गावात घडला. गॅस कनेक्शनचे कार्ड दिले.पण त्यावर ग्राहक क्रमांकच नाही. महिना दोन महिन्यांनी सिलिंडर संपले असता सदर गॅस एजन्सीना कळविले. मात्र पुन्हा १७०० रुपये जमा करावे लागणार असे सांगितले. योजनेच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गडचांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना ही बाब सांगितली. त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली असता एसडीओंना गॅस एजन्सीवर कारवाईचे आदेशही दिले. मात्र समस्या सुटली नाही, अशी व्यथाही यावेळी रायपूर येथील लाभार्थी महिलांनी सांगितली.कोरपना तालुक्यातील रायपूर, शिवापूर, गोविंदपूर, कोथोड(बु.) व कोथोड (खुर्द) ही सर्व गावे शंभर टक्के आदिवासी गावे आहेत. या गावातील महिलांकडून मिताश गॅस एजन्सीने प्रत्येकी २२०० रुपये घेऊन पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन दिले. आता सिलिंडर संपले. ते भरून देण्यासाठी पुन्हा १७०० रुपये मागत आहे. याबाबत एजंसी मालकाशी संपर्क केला तर फोन लागत नाही. येत्या ९ एप्रिलपर्यंत या महिलांना सिलिंडर भरून मिळाले नाही, तर सिलिंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे.- अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, अध्यक्ष, श्रमिक एल्गार.लाभार्थ्यांच्या नावांची यादी एजंसीने गावात पाठविली. गॅस सोडविण्यासाठी २२०० रुपये मागितले. उसणवारी करून रक्कम जमा केली. याची पावतीही दिली नाही. त्यांनी कनेक्शन आॅनलाईनसुद्धा करून दिले नाही. गॅस संपल्यानंतर ते भरून द्या म्हटले, तर पुन्हा १७०० रुपये मागितले. यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.- कल्पना प्रकाश आत्राम, लाभार्थी, रायपूर. ता. कोरपना.याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आली आहे. तक्रारीवरून शहानिशा करण्यासाठी आम्ही पुरवठा विभागाला माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करणार आहे.- विनोद रोकडे, ठाणेदार, गडचांदूर